Beed crime news: बीड जिल्ह्यात शेतीच्या वादातून एका महिलेला बेदम मारहाण करून तिचा पाय तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंजनवती गावात घडलेल्या या घटनेत आश्विनी येडे गंभीर जखमी झाली असून, आरोपींनी यापूर्वीही तीन महिलांवर प्राणघातक हल्ला केला होता.
काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या संतोष देशमुख यांच्या निघृण मारहाण व हत्याप्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी व गुंडगिरी देशामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या जिल्ह्यातलं विनापरवाने पिस्तूल विक्री प्रकरणही बरचं चर्चेत होतं. बीड जिल्ह्यामधल्या राजकारणाने अनेकांचं राजकीय भवितव्यही धोक्यात आलं आहे. दरम्यान, बीड जिल्हा पुन्हा एकदा संतापजनक घटनेने हादरला आहे. या प्रकरणात एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या सर्व वादामागे शेतीचं कारण असल्याचं समोर आलं आहे. सदर महिलेच्या नवऱ्याने यासंबंधी माहिती दिली आहे. दरम्यान, पीडित महिलेवर सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.
मुलाचा घटस्फोट, आईने दुग्धाभिषेक करुन ‘शुद्ध’ केलं, केकवर 12 तोळे सोनं 18 लाख पोटगीचा उल्लेख, पण…
काय आहे नेमकं प्रकरण?
बीडमध्ये शेतीच्या वादातून थरकाप उडवणारी घटना घडली आहे. हे धक्कादायक प्रकरण बीड जिल्ह्याच्या नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती गावात घडले आहे. गावातल्या रघुवीर येडे याच्यासह भावकीतीलच तिघांनी एका महिलेला निर्दयपणे मारहाण करून चक्क तिचे पाय तोडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
महिला गंभीर जखमी
या हल्ल्यामध्ये आश्विनी येडे ही महिला गंभीर जखमी झाली आहे. आश्विनीवर सध्या बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे या आरोपीकडून याआधीही तीन महिलांवर अशाच पद्धतीने प्राणघातक हल्ला केला होता. त्या थरारक घटनांचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
सरकारच्या पॅकेजवर शंका, ओमराजेंनी उदाहरणासह सांगितलं…नेमकं काय म्हणाले?
सातत्याने महिलांवर अत्याचार करणाऱ्या या गुन्हेगारांना लगाम घालण्यासाठी आता पोलिस कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित केला जात आहे.

