Akshay Kumar interviews Devendra Fadnavis : कुठल्या चित्रपटाने तुम्हाला प्रभावित केलं, या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अभिनेते अनिल कपूर यांच्या गाजलेल्या ‘नायक’ सिनेमाचा उल्लेख केला
काय होता प्रश्न?
अक्षय कुमारने देवेंद्र फडणवीस यांना विचारलं, की तुम्ही राजकारणातले स्टार आहात, कोणता चित्रपट किंवा कलाकार आहे, ज्याचा तुमच्यावर प्रभाव आहे? यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की तुमच्या संवेदना किंवा मानवी भावनांना फिल्म प्रभावित करतात, तसे अनेक सिनेमे आहेत. राजकारणाचा विषय झाला, तर एका सिनेमाने मला प्रभावित केलं आणि समस्याही वाढवल्या. तो चित्रपट म्हणजे अनिल कपूर, अमरिश पुरी, राणी मुखर्जी यांचा नायक.एक दिवसाचा मुख्यमंत्री होऊन तोदिवसभरात इतकी कामं करतो, की मी जिथेही जातो लोक म्हणतात, तुम्ही नायक सारखं काम करा, त्यांनी बघा कसं काम केलं, एका दिवसात जग पालटून टाकलं, असं फडणवीस म्हणाले.
Maithili Thakur : विनोद तावडे दूरदर्शी, भाजपकडून निवडणूक लढायचीय, प्रख्यात गायिका मैथिली ठाकूर उत्सुक, म्हणते…
मला एके दिवशी अनिल कपूर भेटले, मी म्हटलं कशाला बनवलात नायक सिनेमा ? ‘तो नायक तर आम्ही नालायक’ असं लोकांना वाटायला लागलं, एका दिवसात कशी इतकी कामं केली, मला वाटतं की या सिनेमाने बेंचमार्क सेट केलाय. माझ्या भावनांना आकार देण्यासाठी सिनेमा प्रभावित केली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तुम्ही एखाद्या क्षेत्रात दीर्घ काळ काम केलं की तुमच्या संवेदना बोथट होतात, मात्र काही सिनेमांनी माझ्या या भावना जिवंत ठेवण्याचं काम केलं, मी असे सिनेमे पाहून पुन्हा तोच सर्वसामान्य माणूस बनतो, जो वर्षानुवर्ष आहे, असं सांगायला फडणवीस विसरले नाहीत.
Maharashtra Politics : शिवसेनेचा अंतर्गत सर्व्हे, भाजपच्या मनसुब्यांना सुरुंग लावणारा एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव, महापौरपदाचं स्वप्न भंगणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही आंबा कसा खाता, असा प्रश्न विचारल्याने अक्षय कुमार टिकेचा धनी झाला होता. फडणवीस नागपूरचे असल्याने तुम्ही संत्रं कसं खाता, असा प्रश्न अक्षयने जाणीवपूर्वक विचारला, त्यावर फडणवीसांनीही, संत्र्याचे दोन तुकडे करा, त्यावर तिखट मीठ लावा आणि आंब्यासारखं चोखून खा, असं मिश्किल उत्तर दिलं.

