• Tue. Jun 16th, 2026
    अतिवृष्टीने शेती उद्ध्वस्त, रोज शेतात चकरा मारायचे अन् आज नको ते केलं, जालना हादरलं

    जालन्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अल्पभूधारक शेतकऱ्याने नैसर्गिक आपत्ती आणि कर्जाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यात मागच्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांनी खरिपात पेरलेली सर्व पिकं जमीनदोस्त झाली. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडेच मोडले आहे. शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्याभरात पाहायला मिळत आहे. याच त्रासाला कंटाळून आज जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील चित्तरवडगाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरात विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

    जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील चित्तर वडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी शिवाजी बाबुराव यादव यांच्याकडे वडिलोपार्जित 1 एकर 15 गुंठे जमीन आहे. या जमिनीत पत्नी आणि आपल्या मुलाबाळांसोबत ते राबराब राबवून आपल्या संसाराचा गाडा हाकलत होते. मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांना किडनीचा आजार झाला.

    वडिलांच्या किडन्या फेल झाल्या यात लाखो रुपये खर्च करून त्यांनी वडिलांना वाचवण्याचा अतोनात प्रयत्न सुरू केला. या प्रयत्नात असतानाच दोन मुली सुद्धा लग्नावर आल्या. आता या मुलींचं लग्न कसं होणार? या चिंतेत ते सतत राहू लागले आणि पुन्हा त्यांनी खरिपाची पेरणी केली. खरीपाची पेरणी करत असताना त्यांनी एका सावकाराकडून उधार पैसे घेऊन पेरणी केली, पीक चांगले आले. शेतातील कपाशी डोलू लागली. आता दिवाळी आणि आपल्या मुलाबाळांचे शिक्षण योग्य प्रकारे या पिकांवर अपण करू शकतो, अशी अपेक्षा बाळगून ते या शेतात राबू लागले. मात्र नियतीला काही हे मान्य नव्हतं आणि मागच्या हप्त्यात संपूर्ण जालना जिल्ह्यात आणि मराठवाड्यात धुवांधार पाऊस झाला.

    या पावसात त्यांची कपाशीचे संपूर्ण पिक होत्याच नव्हतं झाल्याचं चित्र त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं. याच विवंचनेत ते गेल्या 8-10 दिवसापासून शेतात रोज चकरा मारत एकटेच बसत होते. यावेळी त्यांची पत्नी त्यांची समज काढत होती. वडील सुद्धा समजूत काढत होते की, काहीतरी बदल होईल. पण त्यांनी आज राहत्या घरी दुपारी बारा वाजता विषारी औषध प्राशन केले. ही बाब घरच्यांच्या आणि आस पासाच्या रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्यांना खाजगी गाडीत टाकून जिल्हा रुग्णालयात आणलं.

    यावेळी डॉक्टरांनी त्यांच्यावर शर्तीचे प्रयत्न केले. पण उपचार सुरू असताना त्यांची प्रांणजोत मालवली आणि या शेतकऱ्याने जगाचा निरोप घेतला. याप्रकरणी जालना जिल्हा रुग्णालयातील चौकीमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मयत शिवाजी यादव यांच्या पाश्चात वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा मोठा परिवार आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा