Ajit Pawar News : काल गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा होता. यावेळी पारनेरमध्ये आणि जिल्ह्यामध्ये जातीय तेढ निर्माण केला जात आहे. या घटनांबाबत मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने अजित पवरांशी सविस्तर चर्चा केली. द्वेष पसरविणाऱ्यांचा पक्ष न पाहता कठोर कारवाई करा अशा सूचना अजित दादांनी पोलिसांना दिल्या.
काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये वादग्रस्त रांगोळी आणि त्यानंतर कोठला येथे रास्तारोको दरम्यान झालेला लाठीमार यावरून वातावरण तापलं होतं. अजितदादा पारनेरला आल्याचं कळाल्यानंतर शहरातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे काही मागण्या केल्या. कोठला येथे झालेल्या रास्तारोको आंदोलनाच्या आरोपींपैकी अनेक आरोपी घटनेशी संबंध नसताना अटक करण्यात आली आहे, त्यांची नावे वगळावी. पोलिसांनी इतर आरोपांच्या नावाखाली सदर गुन्ह्याशी संबंध नसलेल्या व्यक्तींना त्रास देत आहे ते त्वरित थांबवावे. पोलीस प्रशासनाने मॉर्निंग राऊंड वाढवावे. जे लोक समाजात धार्मिक द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रक्षोभक भाषण करत आहेत अशा व्यक्ती विरोधात हेट स्पिच प्रकरणी पोलिसांनी स्वतःहून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
ऑन ड्युटी असताना दारु प्यायले, गुन्हा दाखल होताच मानसिक तणावात; एसटी ड्रायव्हरने बसमध्येच आपलं आयुष्य संपवलं
मुस्लिम समाजातील शिष्टमंडळानं सांगितलं की, मागील 10 महिन्यांपासून काही लोकप्रतिनिधी व जातीयवादी संघटनेचे लोक वारंवार तणाव निर्माण होईल असं वक्तव्य करत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासाठी जाणून-बुजून कृत्य सुरु आहे. पोलीस प्रशासन त्यांच्याविरोधात कारवाई करत नसल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यात मुस्लिम समाजाला टार्गेट करुन हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे लावली जात असल्यानं अल्पसंख्यांक असलेला मुस्लिम समाज भितीच्या सावटाखाली वावरत आहे. शहरात अशांतता निर्माण झाली असल्यानं त्याचा रोजगार, व्यापार व स्थानिक बाजारपेठेवर दुष्परिणाम झाला आहे. वारंवार घटना घडत असल्यानं ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाला असुरक्षित वातावरण निर्माण झालं असल्याचे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले.
Raigad Crime : हातातून घराची चावी हिसकावली, छातीवर बसून जबरदस्ती; दसऱ्याला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
वादग्रस्त रांगोळी प्रकरणावरुन शहरात जातीय तणाव निर्माण करण्यात आलेला आहे. यामधील आरोपी व त्याच्या कुटुंबीयांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्याला हद्दपार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर हे कृत्य घडविण्यास भाग पाडणारा मास्टरमार्इंड शोधण्याची देखील मागणी शिष्टमंडळाने केली. याप्रसंगी उबेद शेख, हाजी शौकत तांबोळी, माजी उपमहापौर हाजी नजीर शेख, शाकीर शेख, माजी समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, सय्यद खलील, शफी जहागीरदार, अथर खान, इंजि. अख्तर, मतीन सय्यद, राजूशेठ सुपेवाले, सय्यद अख्तर, मोबीन मुल्ला तांबटकर, फारुक बागवान, डॉ. रिजवान शेख, हाफिज जहागीरदार, माजी पोलीस अधिकारी रऊफ रोख, मोबीन, फैय्याज जहागीरदार, फैरोज सय्यद आदी उपस्थित होते.

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा
