• Fri. Mar 6th, 2026

    Sharad Pawar : जयंत पाटलांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरली, पवारांनी फिरवला मुख्यमंत्र्यांना फोन, म्हणाले…

    Sharad Pawar : जयंत पाटलांवर बोलताना पडळकरांची जीभ घसरली, पवारांनी फिरवला मुख्यमंत्र्यांना फोन, म्हणाले…

    Sharad Pawar Call CM Devendra Fadnavis : भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर बोलताना वडिलांचं नाव घेत खालच्या स्तरावर जात टीका केलीय. आता पवार आक्रमक झाले असून त्यांनी थेट फडणवीसांना फोन केला आहे. नेमकं काय बोलले जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली होती. सांगलीमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा वडिलांचं नाव घेत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पडळकरांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत. सांगलीमध्ये राष्ट्रवादीकडून पडळकरांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन केले आहे. अशातच या प्रकरणावरून स्वत: शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समजत आहे. अशी गलिच्छ टीका योग्य नसल्याचं पवारांनी फडणवीसांना म्हटलं असून पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

    गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यावर भाजपची प्रतिक्रिया आली आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी यावर बोलताना आपलं मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राजकारणाचा वारसा चालवणारं राज्य आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची वाटचाल पाहिली तर किती आरोप टीका झाली तर त्यांनी सभ्यता सोडली नाही. शरद पवार हे राज्यातले मोठे नेते आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला असेल तर सकारात्मक पद्धतीने दखल घेतीस, अशा घटना घडतात तेव्हा मुख्यमंत्री समज देत असतता. पवार साहेबांच्या फोनची ते दखल घेतील, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

    गोपीचंद पडळकर हा फक्त एक मोहरा, हा फडणवीस यांनी राजकारणात आणलेलं एक पाप आणि साप आहे. फडणवीसांनी पुढे येत पडळकरसारख्यांची तोंडं बंद करावीत. नाहीतर पुढे येऊन सांगावं ही हे पाप त्याचंच आहे, असंं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशां जगताप यांनी म्हटलं होतं.
    Maharashtra TimesPune Crime: रोहित ठोक रे यांना, यांची आज विकेटच टाकू; गोळीबारापूर्वी निलेश घायवळ टोळीने काय म्हटलं, त्या रात्री नेमकं काय घडलं?

    काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

    माणसं पाठवली. कशासाठी? गोपीचंद पडळकरने कुठल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का? एखादा मधला व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा. अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे. ये बघायला तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून. जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही, काही तरी गडबड आहे का? अशी टीका पडळकर यांनी केली होती.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा