भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. २०१९ च्या निवडणुकांची आठवण करून देत फडणवीसांनी ‘अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का’ गाणंही गायलं. तर खरा ब्रँड हे केवळ बाळासाहेब ठाकरे हेच होते, असा चिमटाही यावेळी फडणवीसांनी काढला.