Sharad Pawar On Devendra Fadnavis: ‘देवाभाऊं’नी महिनाभरात सातबारा कोरा केला नाही, तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळेंनी दिला.
आगामी ठराविक दिवसांत तुम्ही मदत केली नाही तर नाशिकचा हा मोर्चा भविष्यात आणखी उग्र रूप घेईल. ‘देवाभाऊ, देशाच्या आजूबाजूला बघा काय घडत आहे. नेपाळमधे सरकार गेलं आणि भगिनीच्या हातात राज्य आलं आहे. आणखी काही मी बोलणार नाही,’ असा इशाराही पवारांनी या वेळी दिला. शेतकरी कर्जमाफी, पिकाला हमीभाव, ओला दुष्काळ घोषित करण्यासह विविध प्रश्नांबाबत पवारांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये सोमवारी (दि. १५) बळीराजाचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मोर्चाला मार्गदर्शन करताना पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचे थेट नाव न घेता, त्यांच्यावर हल्लाबोल केला.
…अन्यथा एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही; सुप्रिया सुळेंचा नाशिकमधून सरकारला इशारा
आक्रोश मोर्चातून शक्तिप्रदर्शन
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करा, या प्रमुख मागणीसह राज्यातील विविध प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे सोमवारी (दि.१५) शेतकरी आक्रोश मोर्चा काढून महायुती सरकारविरोधात एल्गार पुकारला.
Nashik Crime : अनैतिक संबंधातून वाद, तरुणाने विवाहित प्रेयसीच्या नवऱ्याचा काटा काढला, संतोष रात्रभर…
मनसे, शिवसेना ‘उबाठा’ पाठोपाठ राज्यातील विविध प्रश्नांबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कांदा, सोयाबीन, कापूस या पिकांना हमीभाव मिळावा, वाढती गुन्हेगारी, वोटचोरीसह विविध प्रश्नांबाबत पक्षातर्फे अध्यक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी नेपाळमधील क्रांतीची आठवण करून देत पवार यांनी सरकारला थेट इशाराच दिला.
महायुतीला दिले आव्हान
नाशिक हा शरद पवार यांना मानणारा जिल्हा असला तरी, गेल्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांकडून त्यांचा गड काबिज केला होता. जिल्ह्यात १५ पैकी १४ आमदार महायुतीचे आहेत. त्यामुळे हा गड परत मिळविण्यासाठी पवारांनी शक्तिप्रदर्शनासाठी नाशिकची निवड करीत आक्रोश मोर्चाद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
आदिवासी विभागात खाजगीकरण नको, रोहित पवारांची स्पष्ट भूमिका
घोषणा, बॅनरने वेधले लक्ष
‘कर्जमाफी झालीच पाहिजे’, ‘शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे’, ‘सातबारा कोरा करा नाही तर खुर्ची खाली करा’, ‘शेतकऱ्यांचा आक्रोश जिव्हाळ्याचा’, ‘सत्ताधाऱ्यांचा खोटारडेपणा लाजीरवाणा’, वोटचोरो गद्दी छोडो’, ‘शेतकऱ्यांचा जो आवाज दाबणार त्याला धडा शिकवणार’, ‘शेतकरी आत्महत्या करत असताना कृषिमंत्री विधानसभेत रमी खेळतात’, ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे’, ‘महिलांवर होणारे अत्याचार थांबलेच पाहिजेत’, ‘शेतकऱ्यांचा हक्क द्या, खोटी आश्वासने थांबवा’, अशी लक्षवेधी फलके हाती घेण्यात आली होती. ‘कोण आला रे कोण आला, मोदी शहांचा बाप आला’, ‘गली गली में शोर है, ये सरकार चोर है,’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

