Maharashtra Rain Update: मराठवाड्यात चार दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला. अंबाजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, केज तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे.
मराठवाड्यातील घाटनांद्रा जोगेश्वरी व सीमेवर असलेल्या जळगाव जिल्ह्यातील सातगाव डोंगरी (ता. पाचोरा) परिसरात रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे बामणी व दगडी नदीला अचानक पूर आला. सातगाव डोंगरी येथील धरणात डोंगरमाथ्यावरून पाण्याचा लोंढा येऊन धरण ओसांडून वाहू लागल्याने लगतच्या गावांमध्ये पाणी शिरले. विद्युत उपकेंद्रे, घरे, शेतीसह निम्मे गाव जलमय झाले. पिकांसह मातीही वाहून गेली. शेकडो कुटुंबांच्या घरगुती वस्तू, धान्य, कपडे, खराब झाले. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
Thackeray Brothers : दोन भाऊ एकत्र येणं शरद पवारांना मान्य आहे का? अन् काँग्रेसचं काय? मोठी माहिती समोर
पूरस्थितीमुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात असलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांचे दरवाजे पूर्ण उघडलेली नसल्याने नदी दोन्ही काठावर पूररेषा ओलांडून वाहत आहे.
पुणे शहर व जिल्ह्यात सुमारे ५५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सर्वाधिक उरूळीकांचन येथे १४२.५ मिमी इतका पाऊस झाला. नागपूरमध्ये सोमवारी अनेक भागांमध्ये एक तासाहून अधिक काळ तीव्र पावसाची सरी पडली. गडगडाट आणि विजांच्या कडकडाटामुळे लोकांना घरातच राहावे लागले.
Metro – 3 Aqua Line : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो-३ चा अखेरचा टप्पा दसऱ्याला सुरू होणार? संपूर्ण मार्गावर २७ स्टेशन, पाहा मार्ग
विद्यार्थ्यांना दोराचा वापर करून काढले
नागपूर : मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने राही ठिकाणी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना थांबवून ठेवावे लागले. कोराडी मार्गावरील मॉडर्न स्कूलच्या आवारात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना दोराचा वापर करून शाळेबाहेर आणण्यात आले
शीsss काय घाणेरडे फोटो पाठवलेस, माझ्या नवऱ्याने पाहिलं ना; ‘मालिनी’चा बनाव, मुंबईकर तरुणाला 1 कोटी 73 लाखांना लुबाडलं, आरोपी निघाली बायकोच
मृतदेह वाहून गेला
यवतमाळ : अंत्यसंस्कार सुरू असताना नाल्याला आलेल्या पुरात अर्धवट जळालेला मृतदेह वाहून गेल्याची घटना यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील लहान पांढरकवडा येथे शनिवारी घडली. गावातील कौशल्याबाई महादेव कोंडेकर (५५) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गावात स्मशानभूमी नसल्याने कुटुंबीयांनी जवळच्या नाल्याच्या काठावर अंत्यसंस्कार सुरू केले. त्याच वेळी मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने, कुटुंबीय घरी परतले. तेवढ्यात नाल्याला पूर आल्याने काठावरील मृतदेह वाहून गेला. दोन दिवसां शोध घेऊनही, मृतदेह न सापडल्याने नातेवाइकांनी सरकारी अधिकाऱ्यांकडे मदत मागितली. पण, ‘मृतदेहाचा शोध घेणे नियमात बसत नाही,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यात विहिरीत पडलेल्या मोबाइलसाठी २२ तास शोध मोहीम राबविण्यात आली होती.

