Ratnagiri Youth Ends Life: रत्नागिरीत एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. तो घरातून गणपतीची हातगाडी ठेवून येतो म्हणून निघाला होता. मात्र तो घरी परतलाच नाही. या घटनेने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
13 सप्टेंबर रोजी ही दुर्देवी घटना घडल्याची माहिती आहे. या सगळ्या घटनेबाबत लांजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भूषण हा रात्री 8 वाजताच्या सुमारास घरातून निघून गेला होता. गणपतीची हातगाडी ही वरच्या घरी ठेवून येतो असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता, मात्र तो बराच वेळ झाला तरी घरात परतला नाही. तो घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या मोबाईलवरही संपर्क होत नव्हता. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरच्यांनी पुन्हा त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोबाईल हा कव्हरेजच्या बाहेर दाखवत होता.
आजारी लेकासह आईची 13 व्या मजल्यावरुन उडी, पोलिसांना डायरी सापडली, डोळ्यात पाणी आणणारे अखेरचे शब्द
घरच्यांनी आणि ग्रामस्थांनी त्याची शोधाशोध सुरू केली होती. त्यावेळी 11.15 वाजताच्या सुमारास, भवानी सोमेश्वरचे पुजारी यांनी यांच्या गावातील ग्रामस्थ सुभाष महादेव पवार यांना भूषण हा भवानी सोमेश्वर मंदिराचे शेजारी तळीच्या जवळील आंब्याच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. हे धक्कादायक दृश्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ लांजा पोलिसांना दिली. भूषण याचे वडीलही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही मंदिराचे शेजारी जाऊन वस्तुस्थितीची खात्री केली. तेव्हा आपलाच मुलगा भूषण नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनाही मोठा धक्का बसला.
भूषण राजेश मठकर (वय 22) हा बारावी झाला होता. पाली येथील महाविद्यालयातून त्याने शिक्षण पूर्ण केलं होत. त्याने काही दिवस एका हॉटेलच कामही केलं होतं मात्र अलीकडे तो घरीच होता. त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकरी असलेल्या मठकर कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. भूषण याच्या पश्चात आई-वडील लहान बहीण असं कुटुंब आहे. या घटनेची नोंद लांजा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास लांजा पोलिस करत आहेत.

