आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. नवी मुंबईतून अपहरण झालेली व्यक्ती पूजा खेडकरच्या घरी सापडल्याचा दावा केला जातोय. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : नवी मुंबईतून अपहरण झालेला व्यक्ती हा वादग्रस्त ठरलेल्या माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी यांच्या पुण्यातील घरी सापडल्याचा दावा केला जातोय. पोलिसांनी त्याची आज पूजा खेडकरच्या घरातून सुटका केल्याची माहिती समोर येत आहे. प्रसाद कुमार असं या व्यक्तीचं नाव आहे. प्रसाद कुमार हा ट्रकवर हेल्पर म्हणून काम करायचा. त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. याबाबत एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हिडीओत पूजा खेडकरच्या घरात चौकशीसाठी जाणाऱ्या पोलिसांना मज्जाव करण्यात आल्याचं दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईत काल संध्याकाळी अपघात झाला होता. ट्रक आणि कार यांच्यात अपघात झाला होता. या अपघातात ट्रकचालक आणि कारमधील दोघांचा वाद झाला होता, अशी माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर आम आदमी पक्षाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी ‘एबीपी माझा’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी घटनेची माहिती दिली. तसेच त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरही संबंधित व्हिडीओ शेअर केला आहे.
“पूजा खेडकर याच्या घरी सापडलेला व्यक्ती प्रसाद कुमार याला नवी मुंबईच्या रबाळा येथून पुण्यात पळवून आणलं होतं. त्याला पूजा खेडकरच्या पुण्यातील घरात ठेवलं होतं. ज्यावेळी पूजा खेडकरच्या घरात त्या व्यक्तीच्या सुटकेसाठी गेले तेव्हा पोलिसांना प्रतिबंध करण्यात आला. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनीच पोलिसांना घरात घुसण्यास प्रतिबंध केला”, असं विजय कुंभार यांनी सांगितलं.
“रबाळे येथे पोलीस असताना ड्रायव्हरला उचलून आणण्याची ह्यांची हिंमत होते ह्यांच्यात गुन्हेगारी किती नसानसांत भिनलेली आहे हे सिद्ध होतं. पोलिसांना साथ द्यायची नाही. कायदा हातात घ्यायचा. संबंधित व्यक्तीला पुण्यात आणायचं. त्याला डांबून ठेवायचं. पोलिसांना विरोध करायचा. आता पोलीस कदाचित शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करतील”, अशी माहिती विजय कुंभार यांनी दिली.
“एवढं सगळं रामायण घडलं. आयएएस पद गेलं, त्यांच्या आईलाही अटक झाली होती. आता अजूनही त्यांच्यातील गुन्हेगारी वृत्ती कमी झालेली नाही. यावरुन लक्षात घेतलं पाहिजे की, एकदा प्रशासकीय पदाची हवा डोक्याात शिरली की पद असो किंवा नसो, लोक कसे वागतात. हे प्रकरण लक्षात आलं आहे, असे किती प्रकरणं असतील. आता तरी अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना जेलमध्ये पोलीस टाकतील, अशी अपेक्षा आहे”, असं विजय कुंभार म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा