Ratnagiri Triple Murder Case : रत्नागिरीमध्ये भक्ती मयेकर या तरुणीची तिचा बॉयफ्रेंड दुर्वास पाटील याने हत्या केली. आता या प्रकरणात पुन्हा एक धक्कादायक वळण लागलं आहे. दुर्वासने एक नाहीतर तीन हत्या केलेल्या होत्या. ही गोष्ट त्याचे वडील दर्शन पाटीलला माहिती असूनही त्यानं लपवलं. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. या घटनेनंतर रत्नागिरीमध्ये खळबळ उडाली आहे.
‘तुझ्या मुलाला कुठेतरी बाहेर पाठवून दे’
इतकंच नाही तर सिताराम वीर याला मारहाण आणि त्यानंतर त्याची हत्या केल्याची माहिती असलेल्या राकेश जंगम याचाही खून दुर्वास याने केला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने गेल्या वर्षी जूनमध्येच दाखल केली होती. याचदरम्यान दुर्वासचे वडील दर्शन हा आपल्या घरी येऊन ‘तुझ्या मुलाला कुठेतरी बाहेर पाठवून दे’, असं सांगून गेल्याची गंभीर तक्रार पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपासही पोलिस करत आहेत. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावरून रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनीही काही गंभीर आरोप करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे.
Pune News: पुण्यातील मंचरमध्ये मशिदीचा भाग कोसळला; भुयारासारखी रचना आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ, 200 पोलीस तैनात
भक्ती मयेकर हिने गरोदर असल्यानं ती लग्न करण्यासाठी तिने दुर्वासकडे तगादा लावला होता. तिला आपल्या वाटेतून बाजूला करण्यासाठीच दुर्वासनं तिचा खून केला. भक्तीशी फोनवर बोलतो म्हणून सिताराम वीर यालाही अमानुष मारहाण करून त्याला घरी पाठवून दिलं व त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. यानंतर सिताराम वीर याला केलेली मारहाण व त्याचा झालेला मृत्यू याची माहिती असलेल्या राकेश जंगम यालाही दुर्वासने खून करून संपवलं होतं.
दुर्वासच्या बापाला सर्व माहिती
मात्र, या सगळ्या प्रकरणाची माहिती वडील दर्शन पाटील याला माहिती असल्याचा संशय पोलिसांना आहे. यामुळेच या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. राकेश जंगम यांच्या आईनेही दर्शन पाटील हा आपल्याला घरी येऊन ‘राकेशला कुठेतरी बाहेर लांब पाठवून दे’, असं सांगत होता, असा आरोप खून झालेल्या राकेश जंगम यांच्या आईने केल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण लागलं आहे. दर्शन पाटील यालाही आता या प्रकरणात प्रकरणात संशयित आरोपी म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jalgaon Crime : आसाराम बापूला गुरु कर, सासूचा तगादा; मयुरी ठोसर प्रकरणात भावाचे आरोप, ताईला चटके दिल्याचाही दावा
या सगळ्या प्रकरणांची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश माईनकरअधिक तपास करत आहेत.

