• Sat. Mar 7th, 2026
    Ratnagiri Crime : गर्लफ्रेंडला संपवून दरीत टाकलं, नंतर आणखी दोघांचा जीव घेतला; मुलाचं दुष्कृत्य लपवण्याचं बापाचं कारस्थान अन्…

    Ratnagiri Triple Murder Case : रत्नागिरीमध्ये भक्ती मयेकर या तरुणीची तिचा बॉयफ्रेंड दुर्वास पाटील याने हत्या केली. आता या प्रकरणात पुन्हा एक धक्कादायक वळण लागलं आहे. दुर्वासने एक नाहीतर तीन हत्या केलेल्या होत्या. ही गोष्ट त्याचे वडील दर्शन पाटीलला माहिती असूनही त्यानं लपवलं. त्यामुळे पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. या घटनेनंतर रत्नागिरीमध्ये खळबळ उडाली आहे.

    दुर्वास पाटील तिहेरी मर्डर केस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी : जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांडाचा गंभीर तपास रत्नागिरी पोलिसांकडून सुरू आहे. या तीनही खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला दुर्वास पाटील व त्याचे तीन साथीदार सध्या पोलीस कोठडीत आहेत. या प्रकरणी ज्या ठिकाणी दोन खून झाले ते ठिकाण असलेले सायली बार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 15 दिवसांपूर्वीच सील करण्यात आला. मुख्य संशयित आरोपी दुर्वासचे वडील दर्शन पाटील याच्याकडून सिताराम वीर याला झालेली मारहाण व त्यानंतर झालेला त्याचा मृत्यू, या सगळ्याची माहिती असूनही माहिती दडवून ठेवल्याच्या आरोपाखाली दर्शन पाटील यालाही पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

    ‘तुझ्या मुलाला कुठेतरी बाहेर पाठवून दे’

    इतकंच नाही तर सिताराम वीर याला मारहाण आणि त्यानंतर त्याची हत्या केल्याची माहिती असलेल्या राकेश जंगम याचाही खून दुर्वास याने केला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने गेल्या वर्षी जूनमध्येच दाखल केली होती. याचदरम्यान दुर्वासचे वडील दर्शन हा आपल्या घरी येऊन ‘तुझ्या मुलाला कुठेतरी बाहेर पाठवून दे’, असं सांगून गेल्याची गंभीर तक्रार पोलिसांकडे दिली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपासही पोलिस करत आहेत. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावरून रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनीही काही गंभीर आरोप करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला आहे.
    Maharashtra TimesPune News: पुण्यातील मंचरमध्ये मशिदीचा भाग कोसळला; भुयारासारखी रचना आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ, 200 पोलीस तैनात

    भक्ती मयेकर हिने गरोदर असल्यानं ती लग्न करण्यासाठी तिने दुर्वासकडे तगादा लावला होता. तिला आपल्या वाटेतून बाजूला करण्यासाठीच दुर्वासनं तिचा खून केला. भक्तीशी फोनवर बोलतो म्हणून सिताराम वीर यालाही अमानुष मारहाण करून त्याला घरी पाठवून दिलं व त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. यानंतर सिताराम वीर याला केलेली मारहाण व त्याचा झालेला मृत्यू याची माहिती असलेल्या राकेश जंगम यालाही दुर्वासने खून करून संपवलं होतं.

    दुर्वासच्या बापाला सर्व माहिती

    मात्र, या सगळ्या प्रकरणाची माहिती वडील दर्शन पाटील याला माहिती असल्याचा संशय पोलिसांना आहे. यामुळेच या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे. राकेश जंगम यांच्या आईनेही दर्शन पाटील हा आपल्याला घरी येऊन ‘राकेशला कुठेतरी बाहेर लांब पाठवून दे’, असं सांगत होता, असा आरोप खून झालेल्या राकेश जंगम यांच्या आईने केल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण लागलं आहे. दर्शन पाटील यालाही आता या प्रकरणात प्रकरणात संशयित आरोपी म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesJalgaon Crime : आसाराम बापूला गुरु कर, सासूचा तगादा; मयुरी ठोसर प्रकरणात भावाचे आरोप, ताईला चटके दिल्याचाही दावा

    या सगळ्या प्रकरणांची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश माईनकरअधिक तपास करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा