सततच्या पावसामुळे सिताफळ बागांचे प्रचंड नुकसान, फळबाग उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकाला फाटा देत संत्रा, आंबा, पेरु, डाळिंब आणि सिताफळ या फळबागांची लागवड केली, मात्र यावर्षी फुल आणि फळ धरण्याच्या वेळेस सतत अतिमुसळधार पाऊस पडल्याने या सिताफळ झाडांची 60 ते 70 टक्के सिताफळं खाली गळून पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे
