Chandrapur Woman Died In Tiger Attack: मागच्या वर्षभरातील वन्यजीव हल्ल्यांतील बळींची संख्या २९ इतकी होती. यातील २७ हल्ले वाघाने तर बिबट आणि रानडुकराने प्रत्येकी एक हल्ला केला होता.
पती-पत्नी दोघेही सोमवारी पहाटेच्या सुमारास घरकामासाठी बाहेर पडले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. पत्नीला जबड्यात धरून जाऊ लागला. हे पाहताच पती धावून आले. जीवाची पर्वा न करता पत्नीचे पाय धरून ओढू लागले. तो वाघच… त्याच्या ताकदीसमोर निभाव लागला नाही. डोळ्यादेखत पत्नीने जीव सोडला. चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील सोमनाथ पर्यटनस्थळाजवळील बाबा आमटे प्रकल्पाच्या शांती सदन वसाहतीत ही घटना घडली. अन्नपूर्णा तुळशीराम बिलोने (५२), असे मृत पत्नीचे नाव आहे.
Chandrapur News : ‘मै बडा की तू बडा’, गणपती विसर्जनाला भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, मंडपात कार्यकर्ते भिडले
नेमकं काय घडलं?
सोमवारी पहाटे उठल्यानंतर घरकाम करण्यासाठी अन्नपूर्णा या पतीसोबत घराच्या मागच्या बाजून निघाल्या. रात्रीपासून दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. तुळशीराम यांनी न घाबरता पत्नीला वाचविण्यासाठी धाव घेतली. वाघाच्या जबड्यातून त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करू लागले. काही वेळानंतर वाघाने पळ काढला. मात्र अन्नपूर्णा यांच्या गळा, डाव्या कानावर जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस विभागाला याबाबतची सूचना देण्यात आली. शवविच्छेदनासाठी मृतदेह मूलच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. मृताच्या कुटुंबीयांना तातडीची वीस हजार रुपयांची मदत वनविभागाच्यावतीने देण्यात आली.
Maratha Reservation: कुणबी प्रमाणपत्र द्या! मनोज जरांगे पाटीलांची मागणी, अन्यथा सरकारविरोधी भूमिका घेण्याचा इशारा
वर्षभरात २९ मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात वन्यजीव हल्ल्यातील मृतांची संख्या २९वर पोहचली आहे. यातील हत्ती आणि अस्वलाचा प्रत्येकी एक हल्ला वगळता इतर सर्व वाघाने केले आहेत. मागच्या वर्षभरातील वन्यजीव हल्ल्यांतील बळींची संख्या २९ इतकी होती. यातील २७हल्ले वाघाने तर बिबट आणि रानडुकराने प्रत्येकी एक हल्ला केला होता.

