• Sun. Mar 8th, 2026
    Raigad Accident : सभा आटपून परतताना काळाची झडप, नियंत्रण सुटल्याने रिक्षा डिव्हायडरला धडकली; तिघांचा करुण अंत

    Raigad Rickshaw Accident Three Death : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, रायगडमधल्या म्हसळा तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. या रिक्षा अपघातात तीनजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चारजण किरकोळ जखमी झाली आहेत.

    रायगड अपघात बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मौजे कासारमलाई येथे एका रिक्षाचा भीषण अपघात होऊन रिक्षाचालक संतोष नाना सावंत (वय 38), शांताराम पांडुरंग धोकटे (वय 74) आणि शामा तुकाराम धोकटे (वय 55) तिन्ही रा. कणघर ता. म्हसळा जि. रायगड तिघांचा मृत्यू झाला आहे. तर संजना संतोष मगर (वय 37), प्रभाकर पांडुरंग धाडवे (वय 73), संतोष रामचंद्र मगर (वय 38) आणि पांडुरंग रामचंद्र धोकटे (वय 50) सर्व राहणार कणघर ता. म्हसळा जि रायगड हे चारजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती म्हसळा पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.

    या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणाऱ्या संदेरी येथे कुणबी समाजाची सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेसाठी रिक्षाचालक संतोष नाना सावंत हे त्यांच्या ताब्यात असणाऱ्या रिक्षामध्ये (क्र. एमएच 06 एएल 8331) संजना संतोष मगर, प्रभाकर पांडुरंग धाडवे, संतोष रामचंद्र मगर, पांडुरंग रामचंद्र धोकटे, शांताराम पांडुरंग धोकटे आणि शामा तुकाराम धोकटे ही मंडळी गेली होती. सभा समाप्त झाल्यानंतर म्हसळा तालुक्यातील कणघर येथे येत असताना मयत रिक्षाचालक संतोष सावंत यांच्या ताब्यात असणारी रिक्षा घेऊन दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मौजे कासार मलाई गावचे हद्दीत आले.

    Maharashtra TimesAmot Khatal : ‘आमदार खताळ यांच्याकडून माझ्या मुलाची फसवणूक’, हल्ला प्रकरणातील आरोपीच्या आईची तक्रार; अर्जात मोठे गौप्यस्फोट

    या हद्दीत आल्यानंतर त्यांच्या रिक्षाचा वेग अधिक असल्यानं तसेच रस्ता हा तीव्र उताराचा असल्यानं संतोष सावंत यांचं नियंत्रण सुटलं. रिक्षा कासारमलाई फाट्याच्यापुढे असलेल्या सिमेंट कॉक्रिंटच्या एका दुभाजकाला जाऊन धडकली. या अपघातात संतोष सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. तर शांताराम काळीदास धोकटे आणि शर्मिलाबाई तुकाराम धोकटे यांचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर संजना संतोष मगर, प्रभाकर पांडुरंग धाडवे, संतोष रामचंद्र मगर आणि पांडुरंग रामचंद्र धोकटे यांना किरकोळ तसेच गंभीर जखमी झाले असल्यानं त्यांच्यावर औषध उपचार सुरू आहे.

    Maharashtra Timesमोठी बातमी! उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईचे रस्ते खाली करा, हायकोर्टाचे मराठा आंदोलकांना निर्देश

    अपघाताची माहिती मिळताच श्रीवर्धनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे, म्हसळा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांनी आपल्या कर्मचारी यांच्यासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या अपघाताची फिर्याद पांडुरंग रामचंद्र धोकटे यांनी दिली असून मयत संतोष सावंत यांच्याविरोधात म्हसळा पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत म्हसळा पोलिस ठाण्यात म्हसळा पोलिस ठाणे गुन्हा रजि.नं.५४/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम १०६ (१), १२५ ए १२५ बी, प्रमाणे नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहीणकर करीत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा