• Sun. Sep 13th, 2026
१०८ वर्षांनंतरही लोकमान्य टिळकांनी पूजन केलेल्या गणरायांच्या मखराचं केलं जातंय जतन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील गणेशवाडी गाव आहे. या गावात आजही एका ऐतिहासिक आठवण जपण्यात आली आहे. इथे स्थापन झालेला लोकसेवा संघ गणेशोत्सव मंडळाने गेल्या 108 वर्षांपासून…लोकमान्य टिळकांच्या हस्ते पूजलेले गणेशाचे मखर जतन करून ठेवले आहे. 13 नोव्हेंबर 1917 रोजी टिळकांनी आपल्या कर्नाटक दौऱ्यात गणेशवाडीला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी लोकसेवा संघाच्या जुन्या इमारतीत गणेशोत्सवासाठीच्या मखराचे पूजन केले होते. तोच पवित्र मखर आजही दरवर्षी विधिवत पूजला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed