मानखुर्द, शिवाजीनगर या मतदारसंघात २०२४ मध्ये मतदारयाद्या पडताळणीदरम्यान तब्बल ३२ हजार मतदारांची अचानक वाढ नोंदविण्यात आली. या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे १२ हजार मतांनी निवडून आले. ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन’चे अतिक अहमद खान यांचा त्यांनी पराभव केला होता.
याबाबत अतिक खान म्हणाले, ‘माझ्या मतदारसंघात प्रत्येक प्रभागात किमान दोन ते तीन हजार बनावट मतदार आहेत. जवळपास ५० टक्के मतदार हे उत्तर भारतातही मतदार आहेत आणि इथेही स्थलांतरित झालेल्यांनी मतदान केल्याचे असल्याचे आम्ही उघड केले होते. याविषयी विजयी उमेदवारांनी कधी तक्रारी केल्याचे ऐकिवात नाही.’ अबू आझमी विदेशात असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.
मुंबई क्रिकेटचा इतिहास, आठवणी सांगितल्या….सुनील गावस्करांसमोर शरद पवारांचं जबरदस्त भाषण
मालाड पूर्वमध्ये काँग्रेसचे अस्लम शेख यांचा ६,२२७ मतांनी विजय झाला तर, भाजपचे विनोद शेलार हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान ५० हजारांहून अधिक मतदार वाढल्याचा दावा शेलार यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात ३१,२३४ मतदारांच्या समावेशाबाबत हरकत उपस्थित केली होती. याबाबत आव्हाड यांना याविषयी विचारले असता, ‘माझ्या मतदारसंघात तब्बल २७ हजार बोगस नोंदणी झाल्याची तक्रार मी स्वतः केली होती’, असे त्यांनी सांगितले.
