• Thu. Mar 19th, 2026

    मविआ जिंकलेल्या ठिकाणीही दुबार मतदार, मुंबईत उमेदवारांच्या तक्रारी

    ByMH LIVE NEWS

    Aug 26, 2025
    मविआ जिंकलेल्या ठिकाणीही दुबार मतदार, मुंबईत उमेदवारांच्या तक्रारी
    मुंबई
    मतदारांची दुबार नोंदणी, चुकीचे पत्ते याआधारे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मतचोरी केल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्याने देशभरात खळबळ उडाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. महाविकास आघाडीने जिंकलेल्या मतदारसंघातही दुबार मतदार नोंदणी झाल्याच्या तक्रारी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी केल्याचे उघड झाले आहे.मानखुर्द शिवाजीनगर, मालाड पूर्व आणि मुंब्रा कळवा या मतदारसंघात किमान १० हजार ते ३० हजार दुबार मतदार नोंदणी केल्याचा आरोप करण्यात आला असून, लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान ३० ते ५० हजार मतदारांची नोंदणी वाढल्याची धक्कादायक माहिती तेथील प्रतिस्पर्धी उमेदवार आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

    मानखुर्द, शिवाजीनगर या मतदारसंघात २०२४ मध्ये मतदारयाद्या पडताळणीदरम्यान तब्बल ३२ हजार मतदारांची अचानक वाढ नोंदविण्यात आली. या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे १२ हजार मतांनी निवडून आले. ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन’चे अतिक अहमद खान यांचा त्यांनी पराभव केला होता.

    याबाबत अतिक खान म्हणाले, ‘माझ्या मतदारसंघात प्रत्येक प्रभागात किमान दोन ते तीन हजार बनावट मतदार आहेत. जवळपास ५० टक्के मतदार हे उत्तर भारतातही मतदार आहेत आणि इथेही स्थलांतरित झालेल्यांनी मतदान केल्याचे असल्याचे आम्ही उघड केले होते. याविषयी विजयी उमेदवारांनी कधी तक्रारी केल्याचे ऐकिवात नाही.’ अबू आझमी विदेशात असल्याचे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.

    मुंबई क्रिकेटचा इतिहास, आठवणी सांगितल्या….सुनील गावस्करांसमोर शरद पवारांचं जबरदस्त भाषण

    मालाड पूर्वमध्ये काँग्रेसचे अस्लम शेख यांचा ६,२२७ मतांनी विजय झाला तर, भाजपचे विनोद शेलार हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या मतदारसंघात लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान ५० हजारांहून अधिक मतदार वाढल्याचा दावा शेलार यांनी केला.
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात ३१,२३४ मतदारांच्या समावेशाबाबत हरकत उपस्थित केली होती. याबाबत आव्हाड यांना याविषयी विचारले असता, ‘माझ्या मतदारसंघात तब्बल २७ हजार बोगस नोंदणी झाल्याची तक्रार मी स्वतः केली होती’, असे त्यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed