• Wed. Jul 1st, 2026

    दोन गटात तुफान राडा, धारधार शस्त्रे उपसली, छत्रपती संभाजीनगरात तणाव

    ByMH LIVE NEWS

    Aug 25, 2025
    दोन गटात तुफान राडा, धारधार शस्त्रे उपसली, छत्रपती संभाजीनगरात तणाव
    छत्रपती संभाजीनगर
     शहरातील राजा बाजार कुंवारफल्ली परिसरामध्ये जुन्यावादातून दोन गट आमने-सामने आले. दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली. यातील काही तरुणांना थेट धारदार शस्त्र उपसली. ज्यामध्ये तलवारींचा देखील समावेश होता. यामुळे परिसरात काही काळ तणावाच वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, घटनास्थळावरून आरोपी पसार झाले. एक तलवार ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा संपूर्ण प्रकार शनिवारी मध्यरात्री घडला.

    नेमकं काय घडलं?

    छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती भाग म्हणून राजाबाजार कुंवारफल्ली याला ओळखलं जातं. गेल्या काही दिवसांपासून या भागातील दोन गट सातत्याने समोरासमोर येत आहे. जुन्या वादातून या दोन्ही गटांमध्ये संघर्ष सुरू आहे. दरम्यान, शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास जुन्या वादाच्या कारणावरून हे दोन्ही गट पुन्हा आमने-सामने आले. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. त्यानंतर थेट लाठ्या-काठ्याने मारहाण सुरु झाली.

    एका गटातील तरुण एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी थेट धारदार शस्त्र बाहेर काढली. यामध्ये तलवारीचा देखील समावेश होता. यामुळे परिसरातील वातावरण तणावाच झालं होतं. काही स्थानिकांनी ही माहिती तात्काळ सिटी चौक पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सिटी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अधिकारी कर्मचाऱ्यांनी तरुणांना धरपकड कार्याला सुरुवात करताच गोंधळ घालणारे तरुण घटनास्थळावरून पसार झाले. त्यामुळे पोलिसांच्या हाती कुणीच लागलं नाही.

    एक तलवार जप्त

    स्थानिकांनी पोलिसांना शस्त्राचा वापर झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली. एकापेक्षा अधिक तलवारी या गोंधळात काढण्यात आल्या होत्या. मात्र, पोलिसांच्या हाती फक्त एकच तलवार लागली. राडा करणारे तरुण घटनास्थळावरून प्रसार झाले. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये किरकोळ कारणावरून मोठे वाद होत आहे. या वादात अल्पवयीन मुलांसह तरुण धारदार शस्त्र बाहेर काढत आहे. अनेक घटनांमध्ये नागरिकांना भोसलेच्या देखील घटना उघडकीस आले आहे. सातत्याने वाढत जाणारी ही गुन्हेगारी आता तरी पोलिस थांबवणार का असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed