Raj Thackeray Invites To Uddhav Thackeray: राज ठाकरेंनी फोन करुन भावाला गणपती दर्शनासाठी शिवतीर्थावर येण्याचं आमंत्रण दिलं. त्यामुळे सहकुंटुंब उद्धव ठाकरे बुधवारी राज यांच्या निवासस्थानी जाणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला थेट ‘मातोश्री’वर जात त्यांना शुभेच्छा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिले पाऊल टाकल्यानंतर आता उद्धव यांनी राज यांच्या ‘शिवतीर्थ’वर जाण्याचा निर्णय घेतला आहे. गणपतीदर्शनाचे निमित्त साधत उद्धव ठाकरे सहकुटुंब राज यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. राज यांनी गणेशदर्शनासाठी उद्धव यांना फोन करून निमंत्रण दिल्याची माहिती पुढे आली आहे. राज यांनी उद्धव ठाकरेंना सहकुटुंब गणपती दर्शनासाठी यावे, असे निमंत्रण दिले आहे. उद्धव ठाकरेंनीही हे निमंत्रण स्वीकारले असल्याचे समजते. त्यामुळे उद्धव ठाकरे सहकुटुंब बुधवारी २७ ऑगस्टला संध्याकाळी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी जाणार आहेत.
Mumbai Metro: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! गणेशोत्सवानिमित्त मेट्रो मध्यरात्रीपर्यंत राहणार सुरु, असे आहे नियोजन
कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी मराठीच्या मुद्द्यावर दोन ठाकरे बंधू जवळपास २० वर्षांनी एकत्र आल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते सुखावले आहेत. आता ठाकरे बंधू गणेशोत्सवादरम्यान एकत्र येणार असल्याने समर्थकांमधील उत्साह दुणावला आहे.
Ganeshotsav 2025: ऐक्याचा धागा, श्रद्धेची शिवण! ‘लालबागचा राजा’साठी मुस्लीम कारागिरांनी शिवला मखमली पडदा
… ख्याल अच्छा है; फडणवीसांचा टोला
मुंबई : ‘मतचोरी’ रोखण्यासाठी ‘वाढवले गेलेले’ मतदार कोण आहेत, ते तपासा, त्यांना मतदान करू देऊ नका, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत. त्यावर, ‘दिल को बहलाने के लिये गालिब ये खयाल अच्छा है’,असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी लगावला. राज्यात लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जवळपास ४० ते ४२ लाख मतदार वाढले. हे मतदार कोण आहेत? ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका’ असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यावर ‘हे पक्ष जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल. नरेंद्र मोदी २०१४ मध्ये जिंकले तेव्हा महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती. देशातही काँग्रेसची सत्ता होती’, हे विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे, असे फडणवीस म्हणाले.

