Shivsena Sanjay Raut: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी जावेद मियाँदाद यांच्या मातोश्री भेटीवरून टीका केल्याने संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजपने पैशांसाठी पाकिस्तानसमोर शेपूट घातल्याचा आरोप करत त्यांनी केला आहे.
“देवेंद्र फडणवीस अर्धवट ज्ञानी आहेत. मुळात संपूर्ण भाजप हाच अर्धवट ज्ञानी आहे. भाजपवाल्यांच्या गुडघ्यातही मेंदू नाही. जावेद मियाँदाद मातोश्रीवर काय बोलले, हे दिलीप वेंगसरकर यांना विचारा. पैशासाठी भाजपने पाकड्यांसमोर शेपूट घातली आहे,” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
मोठी बातमी: एकनाथ शिंदेंचा तातडीचा निरोप; तानाजी सावंत तात्काळ मुंबईत पोहोचले, राजकीय पुनर्वसन होणार?
देवेंद्र फडणवीसांना उत्तर देताना संजय राऊत पुढे म्हणाले की, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे चित्रपट पाहायला हवा. त्यावेळीच्या मुलाखती समजून घ्यायला हव्यात. जावेद मियाँदाद हे बाळासाहेबांना भेटायला आले होते. भारत-पाकिस्तान क्रिकेटला विरोध करू नका, असं ते सांगणार होते. पण बाळासाहेबांनी त्यांना चहा घ्यायला सांगितला आणि परत पाठवले. दहशतवाद आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टी एकत्र चालणार नाही, असं बाळासाहेब त्यांना म्हणाले होते,” अशी आठवण राऊत यांनी करून दिली आहे.
“बाळासाहेबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे शेपूट घातली नव्हती. जर तुम्हाला कुंकवाची कदर असेल, तर अशी विधाने करू नका,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.
दरम्यान, “तुम्ही आरशाची फॅक्टरी सुरू केली आहे. पण त्यामध्ये तुम्हाला तुमचे खरे रूप दिसेल. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास तुमचा पाठिंबा आहे की नाही? पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली,” असा आरोप संजय राऊतांनी भाजपवर केला आहे

