Worlds Second Largest LPG carrier Sahyadri Ship : ‘सह्याद्री’ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे एलपीजी वाहतूक जहाज भारताची एलपीजीची गरज पूर्ण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत हे जहाज खरेदी केलं असून हे जहाज ८२ हजार टन एलपीजी वहन करू शकतं
भारताला एकूण मागणीच्या ९८ टक्के एलपीजीची आयात करावी लागते. या स्थितीत ती सर्वाधिक स्वस्त असलेल्या समुद्रीमार्गेच करण्याचा केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचा आग्रह आहे. ही जबाबदारी ‘एससीआय’वर सोपवण्यात आली आहे. त्याअंतर्गतच कंपनीने विदेशातून दोन मोठी जहाजे खरेदी करण्यासाठी करार केला होता. ‘सह्याद्री’ हे त्यातील पहिले जहाज आहे.
Pune News : HSRP नंबरप्लेटसाठी मुदवाढ, पण ‘ही’ तारीख आता अंतिम, अन्यथा कारवाई फिक्स
‘सह्याद्री’ची एलपीजी वहन क्षमता ८२ हजार टन आहे. अतिमोठे वायूवहन जहाज (व्हीएलजीएस) असे या जहाजाला संबोधले जाते. हे २२५ मीटर लांब व ३६ मीटर रुंद आणि २२ मीटर खोली असलेले जहाज आहे. अशाप्रकारे एलपीजीचे वहन करणारे जगातील सर्वांत मोठे जहाज चीनमध्ये आहे. त्याची क्षमता ९३ हजार टन असून लांबी २३० मीटर व रुंदी ३६.६ मीटर इतकी आहे. त्यानंतर सह्याद्री हे दुसऱ्या क्रमांकावरील जहाज आता मुंबईत आहे, तर ‘एससीआय’ याच श्रेणीतील ‘शिवालिक’ हे अन्य जहाज देखील लवकरच खरेदी करणार आहे.
Beed नंतर अजितदादांचा Pune दौरा, पहाटेपासून कामाला सुरुवात; वाहतूक कोंडीच्या समस्येची माहिती घेतली
‘या श्रेणीतील वाहतुकीची भारतातील जहाजे आज अन्य देशांच्या मालकीतील आहेत. हे जहाज मात्र भारतीय कंपनीच्या मालकीतील असणे ही जागतिक पटलावरील महत्त्वाची बाब आहे. ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत या दोन जहाजांची खरेदी होत असून सह्याद्रीची खरेदी स्वातंत्र्यदिनी झाली आहे’, असे केंद्रीय नौकायान मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी यानिमित्ताने सांगितले. दरम्यान, मुंबईत बेस्ट बस गाड्या चार्जिंग पॉईंट नसल्यामुळे तशाचा ओशिवारा आगारात पडून आहेत. त्यामुळे एसी बस असूनही नॉन एसी बसच चालवाव्या लागत आहेत. याआधी एका कंपनीच्या १०० पेक्षा जास्त एसी बसगाड्या चालवल्या जात होत्या, पण कंपनीचं कंत्राट संपल्याने ओशिवरा आगारातून नॉन एसी बसगाड्याच चालवल्या जात आहेत. त्यामुळे एसी बसमधून प्रवास करण्यासाठी तूर्तास प्रवाशांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

