Devendra Fadnavis: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यावेळच्या दहीहंडी उत्सवात सर्वच राजकीय पक्षांनी मुंबई-ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शहर व उपनगरातील विविध कार्यक्रमांना भेट देऊन नागरिकांना शुभेच्छा दिल्या. परिवर्तन दहीहंडीचा दाखला देताना फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले. ‘इतकी वर्षे लोणी कुठे जात होते’, असा प्रश्न विचारला असता ‘कुठे जात होते हे तुम्हाला माहीत आहे. पण तुम्ही माझ्या तोंडातून काढून घेण्याचा प्रयत्न करताय. हे लोणी कोणी लोणी खाल्ले ते जनतेला माहीत आहे’, असेही ते म्हणाले.
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंना ‘लॉटरी’ नाहीतर ‘मटका’ लागला, गणेश नाईकांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा चिमटा, नेमकं काय म्हणाले?
वरळी जांबोरी मैदानावर आयोजित परिवर्तन दहीहंडी उत्सवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांचे सादरीकरण कलाकारांनी केले. उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल फडणवीस यांच्या हस्ते या कलावंतांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास शेलार, दरेकर यांच्यासह कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते. याशिवाय भोईवाडा येथील स्वातंत्र्यसैनिक सदाकांत ढवन उद्यान येथे साजरा झालेल्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून फडणवीस यांनी गोविंदा व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
घाटकोपर येथील लालबहादूर शास्त्री मार्गावर आयोजित दहीहंडी उत्सवात फडणवीस यांनी उपस्थित लष्करी जवानांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. ‘दहीहंडी उत्सवाला उपस्थित असलेल्या लष्करी जवानांना व त्यांच्या शौर्याला मी मनःपूर्वक सलाम करतो. सामाजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून घाटकोपर येथील उत्सवाने जे कार्य केले आहे, ते उल्लेखनीय आहे. गोविंदा पथकांनी उभारलेले थर सैन्यदलांच्या शौर्यासाठी अर्पण केले आहेत, ही एक प्रेरणादायी बाब आहे’, असे ते म्हणाले. ‘दहीहंडी उत्सवात एकावर एक थर लावला जातो, तेव्हा हा संपूर्ण समाज एकत्रित असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश असतो. सर्वांनी एकसंघ राहून पुढे जाण्याचे हे प्रतीक आहे’, असे फडणवीस विक्रोळी येथील टागोरनगरमध्ये आरंभ दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी म्हणाले.
मध्य रेल्वेप्रवाशांना मोठा दिलासा! डिसेंबरपर्यंत १५ डब्यांच्या फेऱ्या दुप्पट, फलाट विस्ताराचे काम सुरु
ठाण्यातील राजकीय आयोजकांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही शहरातील दहीहंडी उत्सवांना हजेरी लावली. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या दहीहंडी उत्सवात त्यांचा वारसा अतिशय समर्थपणे चालवणारे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक उपमुख्यमंत्री शिंदे हेच असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. ‘ही अतिशय ऐतिहासिक अशी हंडी असून तो उत्साह मला दरवर्षी पाहायला मिळतो. आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार कारभार चालवणाऱ्या शिंदे यांनी हा वारसा समर्थपणे चालवला आहे. तुमचा सर्वांचा आशीर्वाद शिंदे यांच्यासह आमच्या पाठीशी सदैव राहील’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टेंभीनाक्यासह शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या रघुनाथनगर येथील संकल्प प्रतिष्ठान, भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या कॅसल मिल येथील शारदा संकल्प प्रतिष्ठान, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठान, हिरानंदानी मेडोज येथील भाजपचे चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजी पाटील यांच्या स्वामी प्रतिष्ठान व टिकुजिनीवाडी येथील नवयुग मित्रमंडळाच्या दहीहंडी उत्सवाला फडणवीस यांनी भेट दिली. यासोबतच भिवंडी येथे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवातही हजेरी लावत त्यांनी भविष्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ‘मतपेरणी’ केली.
मोठी बातमी! मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, मानखुर्दमध्ये गोविंदाचा मृत्यू
‘उत्सवावरची बंधने हटवली’
‘दहीहंडी, गणेश उत्सवावर बंधने होती. ही सगळी बंधने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील आमच्या सरकारने हटवली. सगळी बंधने हटवण्यात आली आहेत. प्रचंड उत्साह आहे. उत्साहात दंहीहंडी साजरी होत आहे. रात्रीपासून पाऊस पडतोय. कितीही पाऊस पडला, तरी गोविंदाच्या उत्साहाचा पाऊस त्यापेक्षा मोठा आहे,’ असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आम्ही २३२ थर लावले : शिंदे
‘गेल्यावर्षी मी विधानसभेची हंडी महायुतीच फोडणार, असा विश्वास व्यक्त केला होता. त्याप्रमाणे महायुतीने ती हंडी फोडली. त्यावेळी आम्ही २३२ ‘आमदाररूपी थर’ लावले’, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाक्यावर गोविंदांना संबोधित नमूद केले. खासदार नरेश म्हस्के, ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, विभागप्रमुख कमलेश चव्हाण, शाखाप्रमुख निखिल बुडजडे, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे याप्रसंगी उपस्थित होते.
मनसेच्या उत्सवात आव्हाडांची उपस्थिती
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी विष्णुनगर येथील पटांगणात आयोजित दहीहंडी उत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीत गात त्यांनी गोविंदांचा उत्साह वाढवला. काही वर्षांपूर्वी आयोजित केल्या जाणाऱ्या ‘संघर्ष’ च्या दहीहंडी उत्सवाच्या आठवणींना आव्हाड यांनी उजळा दिला.

