Palava Bridge : कल्याण-शिळ मार्गावरील उड्डाणपूल एका बाजूने सुरू करण्यात आला आणि त्याला पावसात उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी लगेच खड्डे पडले. आता या नुकत्याच सुरू झालेल्या पुलाचं ऑडिट करण्याचं माजी आमदार राजू पाटील सांगितलं आहे.
कल्याण-शिळ मार्गावरील कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून नोव्हेंबर २०१८मध्ये रस्ता रुंदीकरण सुरू करण्यात आले. या मार्गाचे रुंदीकरण आणि कॉंक्रीटीकरण करताना पुलावर आवश्यक तिथे उड्डाणपूल उभारण्याचेही प्रस्तावित करण्यात आले होते. या मार्गावरील पलावा चौकात मोठी कोंडी होत असल्याने या चौकात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले तरी मागील सहा वर्षांपासून पुलाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. या मार्गावर तासनतास अडकून पडावे लागत असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या पुलाबाबत राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगत असताना वाहनचालक मात्र त्रासले होते.
मुंबईतल्या ‘या’ पुलासाठी 27 कोटींचा खर्च, आता 7 वर्षांतच हातोडा; कारण काय? महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे पैसे पाण्यात
अखेर जुलैमध्ये या पुलाची एक मार्गिका सुरू करण्यात आली. मात्र उद्घाटनानंतर लगेचच पुलावरून दुचाकी घसरू लागल्याने तातडीने पूल बंद करत या पुलावर आणखी भराव टाकण्यात आला. रेती आणि मातीचा भराव असल्याने त्यावर पावसाचे पाणी पडताच पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले. उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुलावर खड्डे पडल्याने पलावा पूल देशभरात चांगलाच गाजला. विरोधकांनी या पुलावरून रान उठवत शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
पश्चिम रेल्वेवर चौपदरीकरणाचा प्रकल्प 7 वर्षापासून प्रलंबित; विरार ते डहाणूदरम्यान प्रवाशांची गैरसोय, वेळापत्रकावर परिणाम
मनसे आमदार राजू पाटील यांनी या पुलाच्या दर्जाबावत प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला स्ट्रक्चरल ‘कीजेटीआय’ कहन ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नापणे धबधब्यावर महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल; नितेश राणेंकडून लोकार्पण सोहळा, पाहा नयनरम्य दृष्य!
नागरिकांमध्ये धाकधूक
पुलावर खड्डे पडल्याचे व्हिडीओ व्हायरल होताच राज्य सरकारने या बाबीची गंभीर दखल घेत या पुलाच्या ऑडिटचे आदेश दिल्याने पुलाच्या दर्जाचावत रहिवाशांच्या मनात धाकधूक वाढली आहे. यामुळे आता सार्वजनिक चांधकाम विभागाने तातडीने या पुलाचे सर्व्हेक्षण करत या पुलाच्या दर्जाची माहिती याची, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

