Farola Water Treatment Plant: छत्रपती संभाजीनगरमधील फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी अयशस्वी ठरली आहे. जलशुद्धीकरण केंद्रात घेतलेले पाणी धरणाच्या दिशेने परत जात असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. जलवाहिनीची पातळी तपासण्यासाठी खोदकाम करण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे शहराला मिळणारा अतिरिक्त पाणीपुरवठा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
शहराला सध्या ७०० आणि १२०० मिलिमीटर व्यासाच्या पाणीपुरवठा योजनांमधून पाणी पुरवठा केला जातो. या दोन्हीही योजना कालबाह्य झाल्यामुळे त्यात वारंवार बिघाड होतात आणि पाणी पुरवठा विस्कळित होते. त्यामुळे २५०० मिलीमीटर व्यासाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे. हे काम होईपर्यंत शहराला वाढीव पाणी मिळावे यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान ९०० मिलीमीटर व्यासाची आणखीन एक पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेसाठी फारोळा येथे २६ एमएलडी (दशलक्ष लिटर) क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. हे केंद्र तयार करण्यासाठी कंत्राटदाराला दोन-तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढीनंतर तयार झालेल्या जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Crime : प्राध्यापक पत्नीला नवऱ्याचा दुसऱ्या मुलीसह सापडला फोटो, सासूही घरी आल्या, पण त्यानं… छ. संभाजीनगरमध्ये खळबळ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीची प्रक्रिया पूर्णपणे फसली आहे. नऊशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून चाचणीसाठी जायकवाडी धरणातून पाणी आणले जात आहे. आणले जाणारे पाणी जलशुद्धीकरण केंद्राजवळ येताच ‘बॅक’ मारत आहे. हे पाणी पुन्हा धरणाच्या दिशेने जात आहे. पाणी जलशुद्धीकरणातच राहिले पाहिजे यासाठी खोदकाम करून, जलवाहिनीची लेव्हल योग्य पद्धतीने घ्यावी लागणार आहे. त्यासाठी एक किंवा दोन दिवस लागतील. एकदा जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आले, की चाचणीचे काम सुकर होणार आहे. मात्र, तूर्तास शहराला वाढीव पाणी मिळण्याचा मुहूर्त पुढे ढकलला गेला आहे.
माधुरीबाबत फडणवीसांची वनताराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा; शिंदे-ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर काय म्हणाले?
या सर्व तांत्रिक अडचणींमुळे शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जलशुद्धीकरण केंद्राची वेळेत कार्यवाही न झाल्यास नागरिकांना पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित उपाययोजना करुन समस्या दूर करण्यासाठी तत्परता दाखविणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून शहराला निर्बाध आणि स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करता येईल.
