• Sun. Mar 8th, 2026
    दादर कबुतरखान्यावरील राड्यानंतर मंगलप्रभात लोढा घटनास्थळी, म्हणाले आंदोलनात बाहेरचे लोक घुसलेले!

    Mumbai Kabutar Khana Row : दादर येथील कबुतरखान्यावर झालेल्या राड्यानंतर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा पाहणीसाठी आले असता त्यांनी आंदोलनात बाहेरचे लोक घुसल्याचा दावा केला

    मंगलप्रभात लोढा (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : दादर येथील कबुतरखान्यावर बंदी घातल्यामुळे जैन बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत परिसरात आंदोलन केलं. कबुतरखान्यावर लावलेली ताडपत्री चाकूने फाडत काही महिलांनी आत प्रवेश केला. त्यानंतर मुंबईचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दादर कबुतरखान्याला भेट देत शांतता राखण्याचं आवाहन केलं. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह ट्रस्टींचीही भेट घेतली. कबुतरखान्याजवळ झालेलं आंदोलन चुकीचं असल्याचं सांगतानाच लोढांनी मात्र यात बाहेरचे लोक घुसल्याचा दावा केला.

    मंगलप्रभात लोढा काय म्हणाले?

    दादर येथील कबुतरखान्यावर झालेल्या राड्यानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा पाहणीसाठी आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “जे झालं ते चुकीचं झालं, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मीटिंग घेऊन, सर्वांचं म्हणणं ऐकून योग्य निर्णय दिला होता. हा मॅटर फक्त हायकोर्टमध्ये प्रलंबित नाही, तर लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी लागेल. तरीही आज सकाळी जे झालं, ते चुकीचं होतं. म्हणून मी इथे आलो.”
    Maharashtra Politics : भाजपचा शिवसेना-राष्ट्रवादीला ठेंगा, पुण्यात 110 जागांवर जाळं विणलं, दादा-भाईंची थेट नाराजी, काय घडतंय?
    “माझी सर्व मुंबईकरांना विनंती आहे, की त्यांनी शांतता राखावी, कायदा हाती घेऊ नये, सरकारचं लक्ष आहे, उद्या कोर्टात काय निर्णय होतो, ते पाहू, तोपर्यंत सर्वांनी शांतता राखा.” असं आवाहन करताना लोढा म्हणाले की “मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं ऐकून घेत निर्णय दिला की कबुतरांचा मृत्यू होता कामा नये, पण सामान्य माणसांच्या आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी. याबाबत महापालिका योग्य ती खबरदारी घेईल.”

    दादर कबूतरखाना बंद करण्याच्या हालचालींना स्थानिकांचा विरोध; रात्री महापालिकेच्या कारवाईवर संताप

    Sangli News : तासगावातील गौरी हत्तिणीला ‘वनतारा’तून 2 कोटींची ऑफर, गणपती पंचायतनच्या विश्वस्तांचा दावा, निर्णय काय?
    दरम्यान, यानंतर लोढा जैन मंदिराच्या विश्वस्तांच्या भेटीसाठी गेले. त्याचवेळी जैन बांधवांनी आंदोलन मागे घेतलं. विश्वस्तांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना लोढा म्हणाले, की “सूचना मिळाली म्हणून मी लगेच आलो, सकाळी झालं ते चुकीचं होतं. अधिकारी आणि ट्रस्टींशी बोललो, ते म्हणाले की इथे बाहेरचे लोक आले आणि त्यांनी आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांचे आभार मानत ट्रस्टी म्हणाले की फडणवीसांनी समाधानकारकच निर्णय दिला होता. जैन समाज किंवा साधूसंत आजच्या आंदोलनात सहभागी नव्हते. तरीही त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, कोणालाही कायदा हातात घ्यायचा नाही” असं लोढांनी यावेळी स्पष्ट केलं.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा