• Tue. Jun 9th, 2026
    रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! अजनी-पुणे स्लिपर ‘वंदे भारत’ लवकरच रुळावर; कधी सुरु होणार? कोणत्या स्टेशन्सवर थांबणार?

    Vande Bharat Express Sleeper Train: अजनी-पुणे स्लीपर वंदे भारत रेल्वे याच महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. कधी होणार सुरु? कोणत्या स्टेशन्सवर असणार थांबे? जाणून घ्या A टू Z माहिती….

    Vande Bharat sleeper coach. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: बहुप्रतीक्षित अजनी-पुणे स्लीपर वंदे भारत रेल्वे लवकरच प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या अखेरीस ती सुरू होणे अपेक्षित आहे. याशिवाय, बेळगाव-बेंगळुरू आणि श्री माता वैष्णो देवी कटरा-अमृतसर या मार्गांवर आणखी दोन ‘वंदे भारत’ रेल्वे सुरू होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑगस्टमध्ये या रेल्वेगाड्यांना हिरवी झेंडी दाखविली जाण्याची शक्यता आहे.

    अजनी-पुणे वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय प्रवाशांसाठी वरदान ठरणार आहे, विशेषत: सणासुदीचा काळ जवळ येत असताना या मार्गावर मागणी वाढते. सध्याच्या वाहतूक पर्यायांवर येणारा ताण कमी करण्यात या रेल्वेची मदत होऊ शकते, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या काळात बस आणि विमानांच्या तिकिटांचे दर गगनाला भिडतात, तर रेल्वेगाड्या गर्दीने खचाखच भरलेल्या असतात. अशावेळी ही वंदे भारत महत्त्वपूर्ण ठरेल, असे मानले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर स्थानकावरील पुनर्विकास कार्य पूर्ण झाल्यानंतर ही रेल्वे अजनीऐवजी तेथून सुरू होऊ शकते.
    ‘बीडीडी’वासींच्या गृहप्रवेशाला लवकरच मुहूर्त; कधी मिळणार नव्या घराच्या चाव्या? मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा
    अजनी-पुणे ‘वंदे भारत’चा वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि दौंड या प्रमुख स्थानकांना थांबा असेल. या मार्गांनी ती पुण्याला पोहोचेल. या मार्गावर या व्यस्त शहरांदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जलद आणि अधिक आरामदायी प्रवास पर्याय यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.

    बेळगाव-बेंगळुरू आणि कटरा-अमृतसर ‘वंदे भारत’ रेल्वेगाड्यांच्या समावेशामुळे संपूर्ण भारतात हाय-स्पीड, अर्ध-विलासी रेल्वे नेटवर्कचा विस्तार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे. या रेल्वेगाड्या कनेक्टिव्हिटी वाढवणे, प्रवास वेळ कमी करणे आणि आधुनिक सुविधा प्रदान करण्यासाठी डिझाइन केल्या गेल्या आहेत, ज्यामुळे त्या प्रवाशांची पसंती बनत आहेत.
    Chhagan bhujbal: मुंबई वगळता युती अशक्य; राज-उद्धव ठाकरेंबाबत भुजबळांचं भाकीत, जरांगेंच्या आंदोलनावरही प्रश्न
    सणासुदीच्या काळात फायदा
    या रेल्वेगाड्या सुरू होणार असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल. सोबतच प्रादेशिक ‘कनेक्टिव्हिटी’ला चालना मिळेल, असे मानले जात आहे. विशेषत: सणासुदीच्या काळात या गाडीचा चांगला फायदा होईल. परवडणाऱ्या आणि कार्यक्षम प्रवास पर्यायांच्या शोधात असलेल्या प्रवाशांसाठी अजनी-पुणे वंदे भारत सोयीची ठरणार आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा