Malegaon Bomb Blast Case : मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामधील सर्व आरोपींची निर्दोष म्हणून सुटका करण्यात आली आहे. १७ वर्षांनी सर्व आरोपींची निर्दोष म्हणून सुटका झाली. मात्र आता मोठा ट्विस्ट आला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या पीडिताच्या वकिलाने काय म्हटलं जाणून घ्या.
निकालाविरोधात हाय कोर्टात दाद मागणार आहे. दोन लाख मिळाले हा न्याय नाही. पुरावे नाहीत म्हणून ते सुटले, तपास यंत्रणा सबळ पुरावे मिळावे देऊ शकले नाहीत. मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता हे सिद्ध झालं. कारण आधी आरोपी मालेगावमध्ये बॉम्ब ब्लास्टच झाला नाही असं बोलत होते. पण कोर्टाने सांगितलं की बॉम्ब ब्लास्ट झाला आहे. ३९ साक्षीदारांनी साक्ष बदलली, यामधील ठराविक पोलिसांनी त्यांची साक्ष बदलली आहे. पुणे आणि मध्य प्रदेशच्या पोलिसांचा समावेश आहे. पण त्यांनी का साक्ष बदलली हे तपास यंत्रणेनं पाहिलं पाहिजे, असं वकील शाहीद नदीम यांनी सांगितलं आहे. या निकालावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
Malegaon Blast Verdict: सगळेच निर्दोष असतील तर बॉम्बस्फोट कोणी घडवला? मालेगावच्या निकालावर काय-काय म्हणाले जलील?
दरम्यान, न्यायालयाच्या या निकालामुळे देशाच्या न्यायालयीन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भाजपने या प्रकरणाचा फायदा घेण्यासाठी आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरांना तिकीट देत निवडून आणलं. त्यांची पात्रता इतकीच होती की मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये त्या आरोपी होत्या, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी या निकालावर आपली स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली.
मालेगावमध्ये कधी झालेला बॉम्बस्फोट?
नाशिकमधील मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ ला बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटामध्ये ६ लोकांचा मृत्यू तर १०० हून अधिक लोक जखमी झाले होते. त्यावेळी रमजानचा पवित्र महिना सुरू होता. नमाज अदा करण्यासाठी जात असताना तिथे हा स्फोट झाला होता.

