Malegaon Bomb Blast Case: २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू. तर १०० वर लोक जखमी झालेले. जाणून घ्या काय घडलेलं २००८मध्ये?
रमझानच्या महिन्यात २९ सप्टेंबर २००८ रोजी रात्री ९.३५ वाजता मालेगावमधील मशिदीजवळ एलएमएल फ्रीडम मोटारसायकलमध्ये लावलेल्या बॉम्बचा भीषण स्फोट होऊन हाहाकार उडाला होता. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर १०१ जण जखमी झाले. ‘सन २००३पासून सक्रिय झालेल्या अभिनव भारत या संघटनेच्या सदस्यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हा बॉम्बस्फोट घडवला. त्यासाठी आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितने काश्मीरमधून आरडीएक्स आणले’, असा आरोप ठेवण्यात आला आहे.
Nashik Police: पोलिस दलात खळबळ; बदलीसाठी अंमलदाराकडे ३५ लाखांची मागणी, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मालेगावात बंदोबस्त
मालेगाव : निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगावी वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात स्थानिक पोलिस यंत्रणेसह अतिरिक्त दहा अधिकारी, शंभर कर्मचाऱ्यांसह दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्याने शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.
देशात १८ राज्यांत डिसेंबरपासून व्याघ्रगणना; ऑगस्टपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार
लूम कारखाना वाटणीवरून मारहाण
मालेगाव : लूम कारखाना आणि हॉटेलच्या वाटणीवरुन झालेल्या वादात एकाला मारहाण झाल्याची घटना शहरातील शिकारी चौकात घडली. याप्रकरणी आयेशानगर पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका मुख्य संशयिताला मंगळवारी रात्री अटक केली. मुस्तफा शेख हाजी जुमन (वय ४३) याने पोलिसांत फिर्याद दिली. मुस्तफा शेख आणि संशयित शेख जमशीर शेख खलील (वय २२, रा. इस्लामपुरा) यांच्यात लूम कारखाना आणि हॉटेलच्या वाटणीवरून वाद झाला. यात फिर्यादीला संशयितासह तिघांनी लाकडी दांडक्याने व इतर साहित्याने मारहाण केली.

