Couple Ends Life In Ratnagiri: रत्नागिरी येथे धुळ्यातील एका जोडप्याने वाशिष्ठी नदीत उडी घेत आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. कौटुंबिक वादातून या दोघांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याचं सांगितलं जात आहे.
पती-पत्नीची वाशिष्ठी नदीत उडी
चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावरून दोघांनी उडी घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याबाबतची माहिती मिळताच चिपळूण पोलीस सुरक्षा यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. या पती – पत्नीचा शोध सुरू करण्यात आला आहे.
Delhi CA Case: तोंडात पाईप, मास्क, प्लास्टिकने केलं सील अन् मग हेलियम गॅस… CA ने इतक्या भयंकर पद्धतीने जीव का दिला?
चिपळूण शहरात पाच परिसरात राहणार हे जोडप्याची ओळख निलेश अहिरे आणि अश्विनी अहिरे अशी झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. हे जोडपं मूळचे उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथील असल्याची माहिती आहे. चिपळूण पाच परिसरात ते सध्या वास्तव्यास आहेत. नवरा बायकोचं भांडण झाल्या वरूनच ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
Ratnagiri News: महिला पोलिसाचा प्रसूती दरम्यान दुर्दैवी मृत्यू, बाळही दगावलं, दोन लेकींचं मातृछत्र हरवलं; रत्नागिरीत हळहळ
या सगळ्या घटनेचे वृत्त कळताच चिपळूणचे उपविभागीय अधिकारी डॉ. आकाश लिगाडे, चिपळूणचे पोलीस निरीक्षक नेमाडे आदी सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एन. डी. आर. एफ. च्या पथकाने या दोन्ही पती – पत्नीचा शोध घेण्याचं काम सुरू केलं आहे. चिपळूण येथे पतीची मोबाईल शॉपी होती, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, या घटनेने चिपळूण परिसर हादरला आहे.नवरा बायकोच्या वादावरूनच हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. सुरक्षा यंत्रणांकडून या दोघांचाही नदीपत्रात युद्ध पातळीवर शोध सुरू करण्यात आला आहे. या दोघांनीही नदीत उडी घेतल्यानंतरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बराच काळ या दोघांना शोधण्याचं कार्य सुरु होतं, मात्र अद्याप या दोघांचाही काही ठाव ठिकाण लागू शकलेला नाही. सध्या या घटनेने परिसरात एकच खळबळ माजलेली आहे.

