• Sun. Mar 15th, 2026
    पाणीगळतीवर उपाययोजना! पुणे महापालिका आणि जलसंपदा विभागाचे संयुक्त टास्क फोर्स तयार

    Pune Water Leakage: पुणे शहरात पाण्याची गळती आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या मुद्द्यांवर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत ४० टक्के पाणीगळती शोधण्यासाठी ‘जॉइंट टास्क फोर्स’ स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले.

    म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे महापालिका हद्दीतील ४० टक्के पाणीगळती शोधण्यासाठी महापालिका; तसेच जलसंपदा विभागाचा ‘जॉइंट टास्क फोर्स’ (संयुक्त कार्यदल) तयार करून येत्या महिनाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी दिले. पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह शेतीला अतिरिक्त पाणी देण्यासाठी मुळशी धरणातून दहा अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मिळवण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    पुणे महापालिकेचा अतिरिक्त पाणी वापर; तसेच मैलापाणी, सांडपाण्यावर पुरेशा क्षमतेने आणि गुणवत्तेने प्रक्रिया करण्यात येत नसल्याबाबत विखे पाटील यांनी महापालिकेत बैठक बोलावली होती. या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार भीमराव तापकीर, बापू पठारे, हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, शंकर मांडेकर आणि सुनील कांबळे यांच्यासह महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी. पी., जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक हेमंत गुणाले, मुख्य अभियंता डॉ. हनुमंत धुमाळ आदी उपस्थित होते.
    Pune Station Crime : ‘बस, मी सोडतो’! पहाटेचे वाजलेले तीन, तरूणाला गाडीत बसवलं, काही वेळात… पुणे स्टेशनला काय घडलं?
    बैठकीच्या सुरुवातीला महापालिकेकडून सादरीकरण करीत पाण्याची सद्यस्थिती उपस्थितांच्या निदर्शनास आणली. विखे पाटील यांनी दोनच मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा केली. त्यामध्ये पाण्याची ४० टक्के गळती असेल, तर हे पाणी मुरते कुठे? आणि महापालिका हद्दीत दररोज १३०० ते १४०० एमएलडी मैलापाणी, सांडपाणी निर्माण होत असेल, तर त्यावर प्रक्रिया का होत नाही. पुणे महापालिकेला सन २०३१ ची ८० लाख लोकसंख्या गृहीत धरून १४.६१ टीएमसी इतका पाणी कोटा मंजूर करण्यात आला आहे. मात्र, महापालिका २२ टीएमसी पाण्याचा वापर करते. देशात, परदेशातील कुठल्याही मोठ्या शहरांच्या तुलनेत पुणे महापालिकेचा पाणी वापर हा मोठ्या प्रमाणात असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आकडेवारीसह निदर्शनास आणले.

    मासे जगले तर पाणी शुद्ध

    पुणे महापालिका सद्यस्थितीत केवळ ४७६ एमएलडी इतक्याच मैलापाणी, सांडपाण्यावर प्रक्रिया करते. उर्वरित ९०० एमएलडी पाणी नदीत सोडले जाते. महापालिकेचे सध्याचे मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प पाहिले तरीही ५०० एमएलडी मैलापाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. नदी प्रदूषित होत असल्याने त्याचा फटका उजनी जलाशयालाही बसतो आहे.शहरांचा पाणी वापर वाढू लागल्याचा फटका ४० हजार हेक्टर क्षेत्राला बसत असल्याचे जलसंपदा विभागाकडून बैठकीत निदर्शनास आणले. महापालिकेच्या मुंढवा जॅकवेलमध्ये शुद्ध केलेल्या पाण्याची गुणवत्ता अत्यंत खराब आहे. त्यावर आमदार शिवतारे यांनी ‘या जॅकवेलच्या शेजारी छोटासा फिशटँक ठेवण्यात यावा. येथील शुद्ध केलेले पाणी त्या टँकमध्ये सोडून त्यामध्ये मासे ठेवावेत. ते मासे जगले तर पाणी शुद्ध असा अर्थ घ्यावा; अन्यथा असे पाणी कॅनॉलमध्ये सोडण्यात येऊ नये,’ असे सांगितले.

    महाजनांवर आरोप, खडसेंचे जावई रेव्ह पार्टीत अडकले, सुषमा अंधारेंची फडणवीसांवर टीका

    नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे; तसेच हेमंत रासने यांनी पाण्याची गळती होते म्हणजे नेमके काय होते, हे पाणी कुठे जाते, अशी विचारणा केली. त्यावर बैठकीत फारसे कोणी उत्तर न दिल्याने महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेत २० वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले अभियंते यावर बोलत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुढील ३० वर्षाचा पाण्याचा आराखडा तयार करण्याची मागणी केल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed