• Sat. Jun 6th, 2026
    दोघींना संपवलं, तिसरीलाही संपवणार तेवढ्यात.. चप्पल, हाडांचे अवशेष…’सिरिअल किलर’ ताब्यात

    Jalgaon Crime News : जळगावमध्ये एका व्यक्तीने दोन महिलांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शारीरिक संबंध ठेवत नंतर त्यांची हत्या करून मृतदेह जंगलात फेकले. एक महिला सुदैवाने त्याच्या तावडीतून वाचली आणि आतापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    निलेश पाटील, जळगाव : जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनिल संदानशिव नावाच्या एका व्यक्तीने दोन महिलांची हत्या केली. त्याने महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतर त्यांची हत्या करून मृतदेह जंगलात फेकून दिले. सुदैवाने, एक महिला त्याच्या तावडीतून वाचली आणि त्यामुळे हा सिरीयल किलर पोलिसांच्या हाती लागला. त्याने शोभाबाई कोळी आणि वैजंताबाई भोई या दोन महिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

    अनिल संदानशिव हा जळगाव जिल्ह्यातील एक ‘लेडी सिरीयल किलर’ होता. तो थंड डोक्याने हत्या करत असल्याचं समोर आलं आहे. त्याचं बोलणं गोड होतं, दिसायलाही साधा असल्याने तो सहजपणे महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. महिलांना जाळ्यात ओढून एकदा त्यांचा विश्वास संपादन केला, की तो त्यांच्या मृत्यूची योजना आखायचा.
    Baramati News : बाईकवरुन वडील दोन चिमुकल्यांसह निघाले, वाटेत काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत, बारामतीत हळहळ

    दोन महिलांना निर्घुणपणे संपवलं

    वैजंताबाई भोई यांच्या मृत्यूच्या प्रवासाची सुरुवात झाली होती. वैजंताबाई यांचं मूळ गाव एरंडोल तालुक्यातील फरकांडे होते. आरोपी अनिल संदानशिव सुरतमध्ये काही दिवस काम करत होता. तिथेच त्याची वैजंताबाई यांच्याशी ओळख झाली. त्यांच्यात जवळीक वाढली. अनिलने गोड बोलून आणि प्रेमाचं नाटक करून वैजंताबाईंना फसवलं.वैजंताबाईंना वाटलं, की अनिलचं तिच्यावर खरं प्रेम आहे. पण प्रेमी म्हणून भासवत असलेला तरुण त्यांचा मृत्यू लिहत होता. २ मे रोजी त्या आपल्या गावी परतल्या. काही दिवसांनी अनिलने त्यांना सुमठाणे शिवारातील जंगलात नेलं. तिथे त्याने दगडाने ठेचून त्यांची हत्या केली आणि मृतदेह फेकून दिला. २३ जुलै रोजी पोलिसांना त्यांचं आधारकार्ड, चप्पल आणि हाडांचे अवशेष मिळाले. त्यावरून त्यांची ओळख पटली.
    रात्री अचानक उलट्यांचा आवाज, एकाच कुटुंबातील चौघांनी उचललं टोकाचं पाऊल; गावात खळबळ, काय घडलं?
    पहिला खून शोभाबाई कोळी यांचा झाला होता. २५ जून रोजी सुमठाणे शिवारात जंगलात शोभाबाई कोळी यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह गोणीत टाकून फेकण्यात आला होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अनिल संदानशिवला अटक केली.

    तिसरी महिला थोडक्यात बचावली

    शाहनाज बी नावाच्या एका महिलेने मात्र स्वतःचा जीव वाचवला. अनिल संदानशिवने तिलाही त्याच जंगलात बोलावलं होतं. त्याने तिच्या डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न केला. पण तिने आरडाओरड केल्याने काही लोक धावत आले. त्यामुळे अनिल तिथून पळून गेला आणि शाहनाज बी या महिलेचा जीव वाचला.

    अनिल संदानशिवची हत्या करण्याची पद्धत ठरलेली होती. तो बसमध्ये, गावात किंवा कामाच्या ठिकाणी महिलांशी गोड बोलून ओळख वाढवायचा. त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा. नंतर त्यांचा विश्वास संपादन करायचा. मग त्यांना सुमठाणे शिवारातील जंगलात नेऊन डोक्यात दगड घालून मारायचा. खून करण्यापूर्वी तो त्यांच्याकडील दागिने आणि पैसे लुटायचा.

    पोलिसांना आव्हान, शिंदेंचा आमदार ताब्यात…जळगावात काय घडलं?

    अनिल संदानशिवच्या या कृत्यांमुळे जळगाव जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि त्यांच्या टीमने या घटनेचा तपास लावला आणि अनिल संदानशिवला अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एकाच व्यक्तीने दोन हत्या केल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा