Solapur Student Ends Life : जुळे सोलापुरात एका १६ वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत कुणालाही जबाबदार धरू नये असं म्हटलं आहे. आईच्या निधनानंतर तो तणावात होता. त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्याने चिठ्ठीत काय लिहिलं?
शिवशरणने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे, “मी शिवशरण. मी मरत आहे. कारण मला जगण्याची इच्छा नाही. माझी आई गेली तेव्हाच जायला पाहिजे होतं, पण मी मामा आणि आजीचं तोंड बघून जिवंत होतो. माझ्या मरण्याचं कारण म्हणजे.. आई काल स्वप्नात आली होती. ‘तू जास्त तणावात का आहेस? माझ्याकडे ये..’ असं म्हणून तिने मला बोलावलं. त्यामुळे मी मरण्याचा विचार केला. मी मामाचे आणि आजीचे खूप आभार मानतो, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केला. माझे लाड पुरवले.. मामा…. मी मरत आहे. मी गेल्यावर माझ्या बहिणीला सुखात ठेव. मी कुठेही नाही जाणार. परत येणार आहे, वाट पाहा. मामा, मला तुला एक सांगायचं आहे. आजीला पप्पाकडे पाठवू नको. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. तू मला आईबाबांपेक्षा जास्त केलंस. त्याबद्दल धन्यवाद. तुमचा पिंट्या…..”
Nagpur News : अहो ऐका ना, एक सेल्फी घ्या! नदी पुलावर थांबले, फोटो घेताच महिलेने घेतली उडी, नेमकं काय घडलं?
शिवशरणने या चिठ्ठीत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने आईच्या आठवणीने आणि तिच्या स्वप्नात येण्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, असं म्हटलं आहे. तसंच, मामा आणि आजीने त्याला दिलेल्या प्रेमाबद्दल त्याने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
Ratnagiri News : नोकरीसाठी मुंबईत आली, पण नियतीने घात केला; रत्नागिरीच्या लेकीचा घाटकोपरमध्ये मृत्यू; कुटुंबियांचा आक्रोश
आईच्या निधनानंतर तीन महिन्यांनी लेकाने जीव सोडला
तीन महिन्यांपूर्वी शिवशरणच्या आईचं निधन झालं होतं. तो पुण्यातील कोंडवा येथे शिक्षण घेत होता. त्याने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले होते. त्याचे वडील एका खाजगी शिक्षण संस्थेत काम करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. आईच्या निधनानंतर शिवशरण तणावात होता.
Solapur News : मी तिला संपवलं, वकील पतीची पोलिसांकडे कबुली; बेडरुममध्ये…. कारण हैराण करणारं
शिवशरणला डॉक्टर व्हायचं होतं. तो अभ्यासात खूप हुशार होता. दहावीत चांगले गुण मिळाल्याने त्याचे मामा त्याच्या शिक्षणाकडे लक्ष देत होते. त्याला डॉक्टर व्हायचं होतं. त्यामुळे तो मामाकडे राहत होता. त्याची आई वारल्यानंतर मामा महादेव तोळनुरे यांनी त्याला शिक्षणासाठी आपल्या घरी आणलं. त्यांनी त्याचं जुळे सोलापुरातील एका कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. तसंच, त्याला खासगी क्लासेसही लावले. पण आईच्या निधनानंतर शिवशरण मानसिक तणावात होता. त्यातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.
संतोष देशमुख प्रकरणानंतरही बीडमध्ये सुधारणा नाही; सरपंच पतीकडून उपसरपंचाला सिनेस्टाईल मारहाण!
त्या दिवशी नेमकं काय घडलं?
घडलेल्या घटनेच्या दिवशी, शिवशरण सकाळी मामाशी फोनवर बोलला होता. त्याने मामाला त्याचा अभ्यास चांगला सुरू असल्याचं सांगितलं होतं. त्याचे मामा अक्कलकोट येथे नोकरी करतात. तो राहत असलेल्या घरात आणखी दोन मुलं होती. नेहमीप्रमाणे तो सकाळी शिकवणीला जाताना लोकांना दिसला होता. मात्र, दुपारी त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. ते सर्व पुण्यात राहतात. शिवशरणच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एका हुशार विद्यार्थ्यांने अशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

