Devendra Fadnavis: विदेशी निधी घेऊन ते काम करीत होते. जंगलातील बंदुकीची लढाई संपण्याच्या मार्गावर असल्याने हे शहरी माओवादी सक्रिय झाले आहेत. त्यांच्यापासून सजग राहावे लागणार आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.
‘गडचिरोलीचा विकास होत असल्याचे दिसताच आदिवासींच्या जमिनी हिसकावण्यात आल्या, त्यांना मारून टाकले, त्यांच्या जमिनीवर उद्योग उभारले, जंगलाची कत्तल केली, असा अपप्रचार सुरू झाला. हा अपप्रचार नेमका सुरू कुठून आहे, याचा पोलिसांनी शोध घेतला असता कोलकाता आणि बेंगळुरू येथून हा प्रकार सुरू असल्याचे आढळले. विदेशी निधी घेऊन ते काम करीत होते. जंगलातील बंदुकीची लढाई संपण्याच्या मार्गावर असल्याने हे शहरी माओवादी सक्रिय झाले आहेत. त्यांच्यापासून सजग राहावे लागणार आहे’, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपचे प्रफुल्ल लोढा अटकेत, एकनाथ खडसेंचं महाजनांकडे बोट; म्हणाले, आरोपी….
कोनसरी येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या एकात्मिक पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. गडचिरोली हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘गडचिरोली हा सर्वाधिक हिरवळ असलेला जिल्हा आहे. या भागात उद्योग सुरू करताना ही हिरवळ वाढवायला हवी. म्हणूनच गडचिरोलीत एक कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. आज यातील ४० लाख झाडे लावण्याचा शुभारंभ करीत आहोत. यातील ८० टक्के झाडे जगलेली असतील.
जल-जंगल-जमीनचा विनाश न करता गडचिरोलीचा विकास करायचा आहे. कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, असा प्रयत्न आहे. ८० किलोमीटर लांबीची स्लरी पाइपलाइन प्रदूषण टाळण्यास मदत करेल. कार्बन उत्सर्जनात सुमारे ५५ टक्के घट होईल. राज्यातील पहिली आणि देशातील चौथी अशी ही स्लरी पाइपलाइन असेल.’ भविष्यात ई-व्हेइकल आणि गॅसवर चालणाऱ्या वाहनांद्वारे ‘ग्रीन ट्रान्सपोर्टेशन’वर भर देऊन प्रदूषणमुक्त विकासाची ग्वाहीदेखील फडणवीस यांनी दिली.
रक्तपेढ्यांवर आरोग्य विभागाचा बडगा; वार्षिक 2000 युनिट रक्तसंकलन नसेल तर बंदीचे संकेत
जिल्हा ‘टॉप टेन’मध्ये येणार
‘गडचिरोली हा माओवादग्रस्त जिल्हा सरकारी भाषेत ‘पनिशमेंटचा जिल्हा’ म्हणून ओळखला जात होता. आता परिस्थिती बदलली आहे. या जिल्ह्यात अधिकारी नियुक्ती मागत आहेत. इथल्या नागरिकांनी माओवादाची साथ सोडून संविधानावर चालणाऱ्या व्यवस्थेसोबत असल्याचे दाखवून दिले आहे. हा बदल लहान नाही. आज गडचिरोलीचे दरडोई उत्पन्न राज्यात सर्वांत कमी आहे. पुढच्या पाच वर्षांत गडचिरोली पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये स्थान नक्कीच मिळवेल’, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. मंगळवारी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस होता. यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. वाढदिवशी गडचिरोलीतील विकास प्रकल्पांचे उद्घाटन करीत या जिल्ह्याकडे त्यांचे विशेष लक्ष असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.

