Chhatrapati Sambhajinagar Accident : शहरात बदली झाल्यामुळे मुकेश हे पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह तारा भवन येथे शासकीय निवासस्थानी कुटुंबासह राहत होते
मुकेश चंद्रभान शिंगाडे असे अपघातात मयत झालेल्या बीएसएनएलच्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश शिंगाडे हे मूळचे अमरावती येथील आहेत. ते बीएसएनएलमध्ये लिपिक म्हणून नोकरी करतात. मुकेश शिंगाडे यांची नुकतीच अमरावती येथून छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाली होती.
शहरात बदली झाल्यामुळे मुकेश हे पत्नी, मुलगा, मुलगी यांच्यासह तारा भवन येथे शासकीय निवासस्थानी कुटुंबासह राहत होते. दरम्यान सोमवारी बीएसएनएलमध्ये कार्यालयीन काम आटवून ते सायंकाळी घरी आले होते. रात्री दहा वाजताच्या सुमारास ते पुन्हा घरातून बाहेर पडले. दुचाकी एम एच 27 बी एस 4433 या दुचाकीने ते वाळुजच्या दिशेने निघाले होते.
याच दरम्यान नगर नाका परिसरामध्ये त्यांची दुचाकी जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांना भीषण अपघात झाला. यामध्ये मुकेश हे दूरवर फेकले गेले, यात ते गंभीर जखमी झाले होते. तर त्यांच्या दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला होता. या घटनेमध्ये मुकेश यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत धडक देणाऱ्या वाहनाने घटनास्थळावरुन पोबारा केला होता. या घटनेमुळे शिंगाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Nashik Accident : दादा, एवढा लेट झालाय, सकाळी जा; नातेवाईकांचा आग्रह मोडला, कार नाल्यात कोसळून सात जणांचा दुर्दैवी अंत
वाहनांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
मुंबई सागरी किनारा मार्ग वाहन चालकांसाठी टप्प्याटप्यात वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला आहे. या मार्गावर वाहनांवर नजर ठेवण्यासाठी 236 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून ते कार्यान्वित करण्यात आले आहेत. एखादा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षाला या कॅमेऱ्यांमार्फत माहिती मिळणार आहे. तर अपघातग्रस्तांनाही वेळेवर मदत पोहोचवात येणार आहे. दिवसभरात किती वाहनांनी या मार्गाचा वापर केला, त्या वाहनांचे प्रकार कोणते, किती वाहनांनी वेगाची मर्यादा ओलांडली याचीही नोंद ठेवता येत आहे.
Mumbra Train accident : गर्दी कमी करण्यासाठी टास्क फोर्स, सरकारचं नवं पाऊल
Pune Crime : कोंढव्यातील केस उलट फिरली, ‘मी पुन्हा येईन’चा एडिटेड सेल्फी दाखवला, तक्रारदार तरुणीवरच गुन्हा
शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत सागरी मार्ग प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी 10.58 किलोमीटर आहे. वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण प्रकल्पावर ठिकठिकाणी विविध प्रकारचे सीसीटिव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. या मार्गावर चार प्रकारचे वैशिष्टय असलेले 236 कॅमेरे बसवून ते कार्यान्वित केले आहेत. हे कॅमेरे वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला जोडण्यात आले आहेत. त्यामुळे या कॅमेऱ्यांमार्फत कारवाई वाहतूक पोलिसांना करणे शक्य होईल.

