Somnath Suryawanshi Case :परभणीच्या विजया सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितले की, त्यांच्या मुलाचा मृत्यू पोलिसांच्या क्रूरतेमुळे झाला. त्यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री सभागृहात खोटे वर्तन करत आरोपींचे रक्षण करत आहेत.
“आम्हाला सरकारवर विश्वास नाही”
विजया सूर्यवंशी म्हणाल्या, “माझ्या मुलाला कसलाही हृदयविकार नव्हता. मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलत आहेत. त्यांना माझ्या मुलाचा खून पचवायचा आहे.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते की, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला. त्यांनी जे. जे. रुग्णालयाच्या अहवालाचा हवाला दिला होता. यावर विजयाबाईंनी आक्षेप घेतला आहे. विजयाबाई म्हणाल्या, “माझा मुलगा संविधानासाठी लढत होता. पोलिसांनी त्याला मारले आणि आम्हाला माहितीही केली नाही.” त्या पुढे म्हणाल्या, “आम्हाला सरकारवर विश्वास नाही. कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, पण मुख्यमंत्री ऐकत नाहीत.”
डर नहीं लगता, पर..; ज्या दुकानात मनसेचा राडा, तिथली पोरं काय म्हणाली? अचानक शटर डाऊन का केलं?
मुख्यमंत्री ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत
आम्ही छत्रपती संभाजीनगरच्याखंडपीठात धाव घेतली होती. न्यायालयाने निकाल देखील दिला आणि दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. पण मुख्यमंत्री फडणवीस हे उच्च न्यायालयाचे देखील ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. कोर्टाच्या आदेशाचे पालन केलं जात नाही गुन्हा दाखल करण्याचे आदेश असतानाही गुन्हा दाखल करण्यात येत नाही. उलट दुसरीकडे माझ्या मुलाच्या मृत्यू विषयी वेगवेगळे रिपोर्ट आणून खोटी माहिती पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे असेही विजया सूर्यवंशी म्हणाल्या.
Mumbai News : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर, मुंबईच्या बैठकीत काय घडलं?
मुख्यमंत्री साहेब तुम्ही किती खोटे बोलणार आहात?
विजया सूर्यवंशी यांनी असा आरोप केला की, डॉक्टरांनी शवविच्छेदनात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे सांगितले. माझ्या मुलाचा मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आला. तिथल्या डॉक्टरांनी कॅमेऱ्यासमोर शवविच्छेदन केले. त्यांच्या अहवालात पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं. पण तरी देखील आमची परवानगी न घेता सरकारने मुंबईतील जे जे रुग्णालयात पुन्हा शवविच्छेदन केले. मुख्यमंत्री खोट्या अहवालांच्या आधारे माझ्या मुलाचा खून दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप विजयाबाईंनी केला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही किती खोटे बोलणार आहात?” असा सवाल देखील विजयाबाई सूर्यवंशी यांनी उपस्थित केला आहे.

