Devendra Fadnavis On Purandar Airport: पुण्याचे दुसरे विमानतळ आपण करणारच आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरंदर विमानतळाचा शनिवारी पुनरुच्चार केला.
केंद्रीय सहकार व नागरी विमानउड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शिरोळे रस्त्यावरील ‘२४ तास जनसंपर्क कार्यालया’चे उद्घाटन; तसेच मंत्रिपदाच्या एक वर्षाच्या कार्यअहवालाचे आणि करोना काळातील अनुभव कथन करणारे ‘प्रथम माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, सुनील कांबळे, योगेश टिळेकर, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते.
संतापजनक! पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीसोबत अधिकाऱ्याकडून वाईट कृत्य, नागपुरात मुंबईच्या PSIविरुद्ध गुन्हा दाखल
‘मुरलीधर मोहोळ यांना मंत्री करण्यात माझे काही श्रेय नाही. आम्हीही बुथचे कार्यकर्ते होतो. पक्ष सर्वांना संधी देतो. पुढची फळी तयार करण्याचा विचार केवळ भाजपमध्ये होतो. मोहोळ यांनी करोनाकाळात महापौर म्हणून चांगले काम केले. संकट काळात कार्यकर्ता आणि नेत्याची क्षमता कळते. केंद्र आणि राज्य सरकारकडील पुण्याच्या प्रलंबित प्रश्नांविषयी मोहोळ सातत्याने पाठपुरावा करतात,’ असे गौरवोद्वगार फडणवीस यांनी काढले.
मोहोळ म्हणाले, ‘भाजप नेते रामभाऊ म्हाळगी यांनी आपल्या कामाचा अहवाल लोकांना सादर केला पाहिजे हा आदर्श घालून दिला. त्याप्रमाणे एक वर्षातील काम समोर ठेवले आहे. २४ तास खासदार कार्यालय सुरू राहील. याद्वारे नागरिकांना विविध योजनांचा लाभ एका ठिकाणी मिळू शकेल.’
MHADA Lottery: हक्काचं घर घ्यायची सुवर्णसंधी! म्हाडाच्या 5000 घरांबाबत मोठी अपडेट, उद्यापासून करता येणार अर्ज
अडीच तास उशिरा पोहचलात…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीनंतर राज्यमंत्र्यांना गप्पा मारण्यासाठी बोलवले होते. ‘आज तुम्ही काय काम केले,’ अशी विचारणा त्यांनी सर्वांना केली. दिल्लीमध्ये त्याच दिवशी विमानतळाचे छत कोसळल्याची घटना घडली होती. त्याबाबत मी त्यांना माहिती दिली. त्यावर ते मला म्हणाले, ‘तुम्ही तिथे अडीच तास उशिरा पोहचलात.’ पंतप्रधानांच्या या वाक्यावरून केंद्र सरकारमधील कामाचा अंदाज मला आला,’ असा किस्सा मुरलीधर मोहोळ यांनी सांगताच हशा पिकला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नेत्यांवर बारीक लक्ष असते. पुढच्या वेळी आमदार होता येईल का, असे खासदार आणि केंद्रीय मंत्री विचारतात. कारण, पक्षशिस्तीमुळे तिथे पद उपभोगता येत नाही. –देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

