Sanjay Raut Marathi News : मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. निकृष्ट दर्जाच्या डाळीवरून झालेल्या या मारहाणीच्या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राऊतांनी या घटनेची निंदा करत मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जर डाळ खराब असेल तर त्याला जबाबदार कोण? तुमचं सरकारच आहे. याच्यापेक्षा वाईट डाळ महाराष्ट्रामध्ये गोर-गरिबांच्या घरामध्ये आदिवासी पाड्यावर मिळते. मोदी जे केही फुकट धान्य वाटतायेत त्याची क्वालिटी पाहा. फक्त आमदारांना ५० कोटी मिळाले आहेत, ठेकेदारांना पैसे मिळालेले नाहीत. कँटीनमध्ये भ्रष्टाचार सुरू आहेच, पण टॉवलवर मारहाण करायची का? आमदाराने मारहाण करायची आणि आपली बाजू मांडायची की मला डाळ, भात मिळाली नाही. मला असं वाटत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
Sanjay Gaikwad Video : बनियन आणि कंबरेला टॉवेल, शिवसेनेच्या संजय गायकवाडांचा आमदार निवासमध्ये मोठा राडा, कँटीनवाल्याला बदडलं
दरम्यान, तक्रार करण्याचे काही सनदशीर मार्ग आहेत. मारहाण करण्याआधी सभागृहात हा विषय मांडू शकता. मुख्यमंत्र्यांना किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करू शकता. पण तुम्ही गरीब कर्मचाऱ्याला मारहाण केली त्याचा दोष काय आहे? हे सरकार आणि त्यांचे आमदार राज्यीतील दुर्बल आहेत. ते आरेला कारे करू शकत नाही त्यांनाच मारत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलं आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र, गुलाबराव पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ पाहिला असेल ज्या पद्धतीने कर्मचाऱ्याला मारहाण झाली आहे. सबागगृहाबाहेर मारहाण झाल्यामुळे त्याला सबागृहात येऊन त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे. तो मुका माणून त्याला बोलण्याचा अधिकार नाही. तो गरीब आहे, तुमचे सरकारचे आमदार गरिबाला अशा प्रकारे लाथा बुक्यांनी मारतायेत आणि सर्वत्र मारतायेत. याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
गायकवाड काय म्हणाले?
आमदार आणि इतर लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही परतताना डबा घेऊन जातो तेव्हा आम्हाला त्रास होतो. आम्हाला वाटायचं की प्रवासमुळे होत असावं पण यांच्या निकृ्ष्ठ जेवणामुळ होत असल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.

