Raj-Uddhav Thackeray Vijay Sabha : हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात जनतेचा मोठा रोष पाहता, फडणवीस सरकारने आपला निर्णय मागे घेतला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज वरळीत विजयी मेळावा घेत आहेत.
हिंदी भाषा सक्तीविरोधात दोन्ही ठाकरेंनी ५ जुलैला मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारनं त्याआधीच दोन्ही जीआर रद्द केले. त्यामुळे मोर्चाचं काय होणार याकडे लक्ष लागलं होतं. अखेर दोन्ही ठाकरेंनी मोर्चाऐवजी विजयी मेळावा घेण्याची घोषणा केली. त्यानुसार दोन्ही ठाकरे आज वरळीत विजयी मेळावा घेणार आहेत. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केवळ ठाकरे बंधूच असतील. अन्य नेत्यांनी व्यासपीठाच्या समोर बसतील. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचं भाषण आधी होईल. शेवटचं भाषण उद्धव ठाकरेंचं असेल.
अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, लेखक अजित भुरे आजच्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करणार आहेत. अतिशय आटोपशीर आणि सुटसुटीत असा आजचा कार्यक्रम असेल. अजित भुरे उत्तम सूत्रसंचालक आहेत. बाईपण भारी देवा, सचिन- द बिलियन ड्रीम्स, मन कस्तुरी रे, बटरफ्लाय अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. यातील बटरफ्लाय, बाईपण भारी देवा या चित्रपटांची निर्मितीदेखील त्यांनीच केली होती.
Raj-Uddhav Melava : पवारांचे दोन्ही दगडांवर पाय, राज-उद्धवच्या मेळाव्याबद्दल पवारांच्या मनात काय?
सहायक भूमिकांमधून Ajit Bhure यांनी त्यांच्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. २००९ मध्ये आलेल्या संतोष मांजरेकर दिग्दर्शित मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात भुरे यांनी लहान, पण प्रभावी भूमिका साकारली होती. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात भुरे यांच्या वाट्याला मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली होती. त्यांच्या वाट्याला अतिशय कमी संवाद आणि प्रसंग आले होते. पण त्यांनी एक चाणाक्ष मुख्यमंत्री उत्तमरित्या साकारला. सचिन खेडेकर यांच्यासोबतचे सीन सर्वाधिक लक्षवेधी होते.

