Jayant Patil: अर्थसंकल्पाबाबत जयंत पाटलांची सरकारवर टीका
‘राज्यावरील आर्थिक बोजा वाढल्याने गरिबांवर, दुर्लक्षित समाजावर अन्याय होत आहे. एसटी, एससी, ओबीसी यांच्यावर खर्च होणारा पैसा कागदावर दाखवला जातो आणि ३१ मार्चला कळते, की तो खर्चच झालेला नाही. राज्य सरकारला आता अर्थसंकल्पाचे संतुलन टिकवणे अवघड झाले आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी केली.
