Gunratna Sadavarte Slams Raj and Uddhav Thackeray : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर मागे घेतल्याच्या निर्णयावर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. सदावर्ते यांच्या या टीकेवर आता ठाकरे बंधूंच्या पक्षांकडून काय प्रत्युत्तर देण्यात येईल, ते पाहणं महत्त्वाचं आहे.
“राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे असो, कुणाच्या बापाच्या घरचं शिक्षण नाही. कोणाच्या हातातलं शिक्षण नाही. सामान्य कष्टकरांच्या लेकरांच्या शिक्षणाचे हरताळ फासलं जातं, स्वत:ची लेकरं किती भाषा शिकले, कोणत्या शाळेत शिकली ते जाहीर करा, नंतर दुसऱ्यांच्या लेकरांच्या शैक्षणिक नुकसानासाठी कुऱ्हाड घेऊन बाहेर यावं. लेकरांच्या नुकसानासाठी तुम्ही कुऱ्हाड घेऊन निघालात. हे कोणताच सामान्य माणूस सहन करणार नाही”, असं सदावर्ते म्हणाले.
‘शेतात पिंकावर रोग येतो तसा राज ठाकरे…’
“राजकीय प्रवृत्ती खूप रसातळाला गेले आहेत. राज ठाकरे सारखे काही इलिमेंट्स अत्यंत गलिच्छ राजकारण करतात. सेप्रेटीससारखे विचार आहेत. माझं तर थेट म्हणणं आहे हे सेप्रेटीससारखे विचार आहेत. लोकसभेसाला जसं संविधान खतरे में हैं असं नरेटिव्ह तयार करण्यात आलं होतं. तसंच आता एक नवीन नरेटिव्ह तयार करण्यात आला की, भाषा खतरे में हैं. कारण निवडणुका जवळ आल्या आहेत. विधानसभेत शिल्लक नसलेले राज ठाकरे हे आता वळवळ करत आहेत. ही वळवळी फार प्रदीर्घ काळ टिकणारी वळवळी नाही. ज्याप्रकारे शेतात पिंकावर रोग येतो तसा राज ठाकरे यांच्या विचारांच्या रोगाला थांबावं यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे. सरकारने प्राध्यापक नरेंद्र जाधव यांची समिती नेमली आहे”, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
‘तुझा टोल होईल रे…’, गुणरत्न सदावर्ते यांचा राज आणि उद्धव ठाकरेंवर घणाघात
‘अबे तुझा टोल होईल’
“तुझा टोल होईल रे, अबे तुझा टोल होईल. तू अजून कोणता घाम गाळून बंगल्यात राहतो हे माहीत नाही. पण कष्टकरांची लेकरं, जी मुलगी अर्ध्या मार्कासाठी वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश न मिळाल्याने शिक्षणापासून थांबून जाते त्याचा विचार राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरेंना येणार नाही. कारण त्यांची फडफड ही त्यांच्या मुलांचं राजकीय भविष्य काय असेल त्यासाठी प्रयत्न आहेत. महाराष्ट्राला वेठीस घेण्याचा प्रकार होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने समिती स्थापन केली आहे. सरकारला तीन भाषा आणाव्याच लागतील. कारण सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उद्धव ठाकरेंच्या काळात लागू झालं आहे”, असं म्हणत सदावर्तेंनी ठाकरे बंधूंवर खोचक टीका केली.

