Sanjay Raut Marathi News : मुंबईत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले. राज्य सरकारने हिंदी भाषेचा अध्यादेश काढला, ज्यामुळे वाद निर्माण झाला. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
देवेंद्र फडणवीसांच्या शुभेच्छांवर मराठी माणसाची एकजूट ठरत नाही. जर देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल, मिंधे, हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकतात मग दोन भाऊ एकत्र येण्यात तुमच्या पोटात कशाल दुखत आहे. तुम्ही सरकार बनवण्यासाटी जे काही भ्रष्ट कडबोळ एकत्र केलंय त्यावर व्यक्त व्हा. दोन एका विचाराचे नेते एकत्र येतात तुम्ही अस्वस्थ होताय, तुम्हाला वैफल्य आलेलं स्पष्ट दिसतंय, आता आपलं काय? असं संजय राऊत म्हणाले.
Uddhav Thackeray: एक फसला, हा दुसरा डाव; मुख्यमंत्री मराठी भाषाविरोधी, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांना भ्रष्ट नेता बोलत होते, फडणवीस अजित पवारांना तुरूंगात टाकायला निघाले, पंतप्रधान मोदी प्रफुल्ल पटेलांना दाऊदचा हस्तक बोलत होते, उगाच भूतकाळात जायला लावू नका. कोण संपलयं? कोण टिकलंय? कोण वाढतंय हे येणार काळ ठरवेलय. भाजपची खोटं बोलण्याची एक राष्ट्रीय पॉलिसी आहे. यानुसार महाराष्ट्रातील लोकं काम करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी एक रिपोर्ट बनवला आहे तर समोर आणा, एक रिपोर्ट समोर आलाय त्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकत नाही का? राष्ट्रीय पॉलिसी राज्यासमोर येते त्यावर चर्चा करणं गरजेचं असतं. देवेंद्र फडणवीस तीनवेळा मुख्यमंत्री बनले आहेत त्यांना इतकंही माहिती नाहीये का? असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
हिंदी सक्तीचे GR रद्द होताच राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, उशिरा आलेले शहाणपण म्हणता येणार नाही, कारण…
जुलैच्या मोर्चाची तयारी सुरू झाली होती. दोन्ही पक्षांनी दोन नेत्यांची निवड केली होती. तयारी झाली आहे तर आता याचं रूपांतर विजयी जल्लोषात करावं अशी दोन्ही बाजूची भूमिका आहे. यावर राज ठाकरे यांच्याशी बोलणं झालं, आम्ही चर्चा केली. आजे ते यावर आपलं मत देतील. मेळावा नक्कीच एकत्र होईल. विजय जल्लोषात कोणालाही दूर ठेवून जल्लोष होणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

