Taloja-Kharghar Flyover: तळोजा-खारघर उड्डाणपुलाचा काही भाग सुरू होऊनही, तळोजा भुयारी मार्गात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय कायम आहे. उड्डाणपुलाची दुसरी बाजू वाहतुकीसाठी सुरू न केल्याने लोकायुक्तांकडे तक्रार दाखल झाली आहे. खारघर बाजूकडील सेवा रस्ता सुरू केल्यास तळोज्यातील वाहतूक कोंडी कमी होईल, अशी नागरिकांची मागणी आहे.
सिडकोने विकसित केलेल्या तळोजा फेज वन आणि फेज टू नोडमध्ये प्रवेश करण्याचे त्रांगडे अनेक वर्षांनंतरही सुटलेले नाही. खारघरबाजूने मेट्रोशिवाय इतर मार्गानी तळोजा नोडमध्ये प्रवेश करणे सहज सोपे नाही. पनवेल-दिवा रेल्वेमार्गावरील पेंधर फाटक आणि खारघरला जोडणाऱ्या रस्त्यावरून आल्यास नियोजन फसलेला अंडरपास या दोन मार्गातून रस्ता ओलांडावा लागतो. रेल्व रुळाच्या खाली असलेल्या भुयारी मार्गात पाणी भरले की, हलक्या वाहनांना तळोजात जाणे अवघड होते. पेंधर फाटकाशिवाय इतर पर्याय नसल्यामुळे वाहनांच्या रांगा पनवेल-मुंब्रा महामार्गापर्यंत लागतात.
Mumbai News: पुल बांधला, पण ट्रॅफिक तसेच! विक्रोळी उड्डाणपुलावरही वाहतुक कोंडीची समस्या सुटेना
नागरिकांना हा त्रास नेहमीचा झाला असून, पावसाळ्यात भुयारी मार्ग पाण्याने भरत असल्यामुळे त्रास सहन करावा लागतो. कोंडीला कंटाळून काही दिवसांपूर्वी खारघर-तळोजाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचा वापर सुरू करून काही नागरिकांनी सगळ्यांना दिलासा दिला. तळोजाहून खारघरच्या दिशेने जाऊन पुलावरून यूटर्न घेतला जातो. यूटर्न घेऊन वाहने पुन्हा पनवेल-मुंब्रा महामार्गाला लागतात. कांदळवनामुळे पुढील उड्डाणपुलाच्या नंतरचा रस्ता पूर्ण न झाल्याने सध्या उड्डाणपुलाचा वापर किमान रेल्वे ट्रॅक ओलांडण्यासाठी नागरिक करतात.
परंतु तळोज्यात जाण्यासाठी इतर मार्ग नसल्यामुळे अंडरपास पाण्याने भरला की, पेंधर फाटकाजवळ रांग लागते. ही रांग कमी व्हावी म्हणून सध्या खारघर बाजूकडून पुलावर चढण्यासाठी बंद केलेला सेवा रस्ता सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली ठेवला आहे. दुसरी बाजू वाहतुकीसाठी सुरू ठेवल्यास नागरिकांची मोठी गैरसोय मिटेल, अशी मागणी नागरिक करीत आहेत. सर्व्हिस रोड सुरू करून वाहने खारघर बाजूकडून जाऊन तळोजाच्या दिशेने जाऊ शकली, तर फाटकावर लागणाऱ्या वाहनांच्या रांगा आपसूकच कमी होतील, असे म्हटले आहे.पाणी तुंबल्याने भुयारी मार्ग बंद
सिडकोच्या नियोजनशून्य कामामुळे तळोजातील प्रवेशद्वार ओलांडण्यासाठी उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू करण्याची गरज आहे. हे सुरू केल्यास आम्हा नागरिकांची मोठी गैरसोय दुर होईल. याबाबतची तक्रार लोकायुक्तांकडे केली आहे.
राजीव सिन्हा, तक्रारदार नागरिक
Navi Mumbai: तळोजा -खारघर उड्ड्णपुलाचा दुसरा भाग कधी सुरू होणार? पाणी तुंबून भुयारी मार्ग बंद झाल्याने नागरिकांचा सवाल
अप्पर खारघरला सुखकर प्रवेश कधी ?
तळोजा खारघर उड्डाणपूल तयार झाला असला, तरी अद्यापही पुलानंतरचा रस्ता खारघर शहराला जोडू शकलेला नाही. त्यामुळे तळोजा परिसरात राहण्यास येणाऱ्या नागरिकांची संख्या रोडावली आहे. अप्पर खारघर म्हणून ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सिडको प्रशासनाने प्रवेशद्वाराचे कोडे लवकर सोडवावे, अशी इच्छा नागरिक व्यक्त करीत आहेत.
