Uddhav Thackeray News : संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. राऊत यांनी तुरुंगातील अनुभव सांगितले. तुरुंगातील एक एक दिवस कसा होता हे सांगताना संजय राऊत हे दिसले.
या पुस्तक सोहळ्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी संजय राऊतांना अटक झाली, त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलो तर त्यांच्या आईने आणि पत्नीने आम्हालाच धीर दिला. आपण आज जे बघतोय त्याला लोकशाही मानायचे की, अजून काही..मला जर कोणी म्हणेल की, अमित शहा तुमच्या घरी आले होते का? त्यांची काही मदत केली का, असे मला कोणी विचारले की, मी आठवत नाही असे म्हणेल.
एक तरी निवडणूक देशामध्ये बॅलेट पेपरवर घ्या देशात, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, आमचे हिंदूत्व देशासाठी आहे. पाकिस्तानच्या अगोदर आम्हाला खतम करा म्हणतात. म्हणजे मरायचे आपल्या सैनिकांनी. तिकडे क्रिकेट मॅच सुरू होईल सर्व होईल. तुम्ही शिवसेनेला संपायला निघाला आहात. ‘संजय आज तुझा शिवसेनाप्रमुखांना अभिमान वाटला असेल’, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. अशा अनेक लढाया लढून आपण इथपर्यंत आलो आहोत. हुकूमशाह कोणीही असला तरी त्यांना जावंच लागतं.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले ‘हे पुस्तक वाचल्यावर तुरूंग याची भितीच लोकांच्या मनातून जाईल, हे काम तू संजय केलंय’. ‘हे सश्या सारखा घुशी हे आता आपल्याला ऐकायला बरे वाटतंय. मात्र, तिकडे त्याने काय भोगले असेल या पुस्तकात तू रडगाणे गायले नाही तर रडणाऱ्या लोकांना धीर देण्याचा उत्तम प्रयत्न केला आहेस’, असे ठाकरेंनी म्हटले. पुढे ते म्हणाले की, पवार साहेब आपण म्हणालात, सरकार येतात जातात. हे सरकार आपल्याला उद्या घालवावेच लागेल. सर्वत्र हे पुस्तक पसरो आणि लढणारी पिढी तयार होवो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

