मुंबई-प्रतिनिधी
अभिनेत्री जानकी बोडीवालाने अजय देवगण आणि आर माधवन यांच्या ‘शैतान’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाटी छाप पाडली. आता तिने गुजराती हॉरर चित्रपट ‘वश’ बद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यावरुन शैतान हा हिंदी रिमेक बनवला होता. तिने सांगितले की दिग्दर्शक कृष्णदेव याज्ञिक यांनी तिला एक सीन साठी विचारले होते की ती प्रत्यक्षात लघवी करू शकते की नाही. आणि मग तो सीन झाला की नाही याबद्दल अभिनेत्रीने उघडपणे सांगितले.
जानकी बोडीवालाने ‘फिल्मफेअर’ ला दिलेल्या मुलाखतीत या सीनबद्दल सांगितले, ज्यामध्ये तिचे पात्र आर्याला भूतबादा झालेली असते आणि एक वेळ अशी येते की ते भूत तिला लघूशंका करायला सुद्धा सोडत नाही त्यामुळे तिला तिथेच करावी लागते. जेव्हा दिग्दर्शकाने तिला त्या सीनबद्दल विचारले की ती खरोखर लघवी करेल का, तेव्हा तिने के मान्य केले. जानकी म्हणाली, ‘मी गुजराती व्हर्जन केले. आणि मला तिथेही तोच सीन करावा लागला. आम्ही कार्यशाळा करत असताना दिग्दर्शकाने मला विचारले की तू खरोखर लघवीचा सीन करू शकतेस का? कारण त्याचा खूप मोठा प्रभाव पडेल आणि मी त्याबद्दल खूप आनंदी होते. एक अभिनेत्री असल्याने, मला पडद्यावर ते करण्याची संधी मिळत आहे. असे काहीतरी जे यापूर्वी कोणीही केले नाही.मी जिवाशिवाय कोणाचाही विचार करु शकत नाही नंदिनीने निक्षून सांगताच काव्याला धक्का, पार्थचा बायकोला वाचवायला आटापिटा
जानकी बोडीवाला आणि तो लघवीचा सीन
जानकीने दिग्दर्शकाला एक चांगला माणूस म्हटले. त्या सीनबद्दल ती पुढे म्हणाली की तिच्या आणि दिग्दर्शकाच्या मते, तो सीन शूट करणे अशक्य वाटत होते. अभिनेत्री म्हणाली की ती त्या सीनमुळे चित्रपट करण्यास सहमत झाली कारण ती एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध करु इच्छित होती. ती म्हणाली, ‘पण नंतर तो सीन करता आला नाही कारण त्यासाठी अनेक रिटेक घ्यावे लागले असते आणि सेटवर ते व्यावहारिकदृष्ट्या शक्य नव्हते. म्हणून आम्हाला तो करण्याचा एक मार्ग सापडला. मला आनंद झाला की मला खऱ्या आयुष्यात मी करू शकत नाही अशा सर्व गोष्टी करायला मिळाल्या. आणि तो सीन अक्षरशः माझा आवडता सीन आहे. आणि म्हणूनच मी त्या चित्रपटासाठी होकार दिला.’
‘वश’ चित्रपटात हितू कनोडिया, नीलम पांचाल आणि हितेन कुमार हे कलाकार दिसले होते आणि ‘शैतान’ मध्ये अजय देवगन, ज्योतिका आणि आर माधवन दिसले होते. हा चित्रपट एका कुटुंबाची कथा आहे ज्याला एका शैतानाने त्यांच्या घरात बंदिस्त करुन ठेवले होते आणि दोन्ही चित्रपटांमध्ये, जानकीनेच त्या मुलीची भूमिका साकारली आहे जिला शैतानाने पछाडले आहे आणि ती त्याच्या जाळ्यात अडकते आणि नंतर तिचे वडिल तिला यातून मुक्त करतात.
