• Sun. Mar 8th, 2026
    पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकाला ‘बोरीवली’ हे नाव कसं पडलं? काय आहे रंजक इतिहास?

    Borivali Railway Station Name History- पश्चिम रेल्वेवरील बोरीवली हे प्रमुख स्थानक आहे. या स्थानकाच्या नावाचाही रंजक इतिहास आहे. जाणन घेऊया त्याबद्दल

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: बोरीवली हे मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानक आहे. या स्थानकावरुन चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या स्लो आणि फास्ट लोकल धावतात. त्यामुळे या स्थानकांवर प्रवाश्यांची प्रचंड गर्दी असते. शिवाय पश्चिम आणि उत्तर भारताच्या दिशेने जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांना या स्थानकांवर थांबा असल्याने परराज्यात जाणाऱ्या प्रवाश्यांची गर्दी ही या स्थानकावर असते. रिपोर्टनुसार, जवळजवळ 3 लाख प्रवासी या स्थानकावरुन प्रवास करतात . बोरीवली स्थानकाचे निर्माण 1867 साली झाले आहे. बोरीवली हा मुंबई उपनगरातील तालुका आहे. बोरीवली या नावाची रंजक कथा आपण जाणून घेऊया.

    बोरीवली नाव कसे पडले?
    बोरीवलीचे नाव एका फळाच्या नावाने पडल्याचे बोलले जाते. असे सांगितले जाते की, मुंबईच्या उत्तरेला वनांचा मोठा परिसर होता . त्या वनांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बोरांची झाडे होती. बोरांच्या झाडांमुळे त्या परिसराला बोरीवली असे म्हटले गेले. आणि त्यावरुनच रेल्वे स्थानकाचेही नाव बोरीवली असे देण्यात आले.

    बोरीवलीतील प्रमुख ठिकाणे
    बोरीवलीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. याच भागात असून कान्हेरी लेण्या आहेत. बोरीवलीत गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेला वझिरा गणपती आहे. गोराई समुद्र किनारा,पॅगोडा, अशी असंख्य पर्यटन स्थळे बोरीवलीत आहेत. पूर्वी जंगलं असणाऱ्या परिसरात आता मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहिल्या आहेत. अनेक जुन्या इमारतींचा मोठ्या प्रमाणात पुनर्विकास होताना पाहायला मिळत आहे. शहरातील रंगंभूमीचे महत्त्वाचे केंद्र असलेले प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरीवली पश्चिमेला आहे.

    देशातील पहिले दृष्टीहीन सुगम स्थानक
    बोरीवली स्थानक हे भारतातील पहिले दृष्टीहीन सुगम स्थानक आहे. 2018 साली बोरीवली स्थानकाला हा मान मिळाला. दृष्टीहीनांसाठी ब्रेल लिपी चिन्हीत फुटओवर ब्रिजचे रेलिंग, प्रवेशद्वार, सबवे रेलिंग अशा अनेक सुविधा दिल्या गेल्या आहेत. गोरेगावपर्यंत आलेल्या हार्बर रेल्वेला बोरीवलीपर्यंत वाढवण्याचे काम रेल्वे विभागाद्वारे केले जात आहे. बोरीवलीवरुन थेट पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला जाणे शक्य होणार आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed