• Sun. Jun 7th, 2026

    टँकरखाली लाखोंची ओंजळ; नाशिक जिल्ह्यात ४३५ ठिकाणी सव्वादोन लाख लोकांना १२७ टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

    टँकरखाली लाखोंची ओंजळ; नाशिक जिल्ह्यात ४३५ ठिकाणी सव्वादोन लाख लोकांना १२७ टँकरद्वारे होतोय पाणीपुरवठा

    Nashik Water Crisis: दिंडोरी, नाशिक, कळवण आणि निफाड वगळता अन्य ११ तालुक्यांमधील १२१ गावे आणि ३१४ वाड्यांवरील २ लाख २८ हजार रहिवाशांना १२७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

    water tanker (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. वृत्तसेवा, मालेगाव: एकीकडे अवकाळी पावसाने जिल्हाभर थैमान घातले असताना अनेक ठिकाणी पाणीटंचाईच्या झळाही जाणवत आहेत. दिंडोरी, नाशिक, कळवण आणि निफाड वगळता अन्य ११ तालुक्यांमधील १२१ गावे आणि ३१४ वाड्यांवरील २ लाख २८ हजार रहिवाशांना १२७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जेथे पाऊस तेथेच पाणीटंचाई असे विरोधाभासी चित्र जिल्ह्यात सध्या पहायला मिळत आहे.

    स्थानिक पातळीवरील विहिरी, तलाव, बंधारे यांमधील पाणीपातळी खालावल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. हंडाभर पाण्यासाठी एक दोन किलोमीटर पायपीट करण्याच्या त्रासातून ग्रामस्थांची मुक्तता व्हावी याकरिता ग्रामपंचायतींनी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करून घेतला आहे.
    कोकणातून थेट जा पश्चिम महाराष्ट्रात! तब्बल १७५ कोटींचा केबल स्टेड ब्रिज, रत्नागिरी ते महाबळेश्वर अंतर होणार कमी
    जिल्ह्यात सद्यस्थितीत , चांदवड, देवळा, इगतपुरी, मालेगाव, नांदगाव, पेठ, सुरगाणा, सिन्नर, त्र्यंबकेश्वर आणि येवला या तालुक्यांमध्ये अनेक गावे आणि वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या तालुक्यांमधील १२१ गावे आणि ३१५ वाड्या अशा ४३५ ठिकाणी १४ खासगी आणि ११३ सरकारी अशा एकूण १२७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येवल्यात सर्वाधिक ११७ ठिकाणी ३४ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. खालोखाल इगतपुरीत ७१ ठिकाणी १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
    शेतकऱ्यांचे गणित कोलमडले! नाशकात कांदा घसरल्याने उत्पादक चिंतेत, क्विंटलला मिळतोय ‘इतका’ दर
    महत्त्वाचे मुद्दे…
    जिल्ह्यातील काही गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता तेथील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले
    काही विहिरींमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असल्याने टँकरसाठीदेखील अशा विहिरींचे अधिग्रहण
    गावांसाठी १५ विहिरींचे, तर टँकरसाठी ५२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती
    जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, ७०१ कोटींचा आराखडा तयार
    जिल्ह्यातील परिस्थिती
    तालुका -गावे -टँकर -लोकसंख्या

    येवला –११७ –३४ –६१,४१८
    इगतपुरी –७१ –१८ –२४,२७०
    नांदगाव –६७ –१५ –२५,८६०
    सिन्नर –६५ –१४ –२५,३६८
    मालेगाव –३७ –११ –२२,६८९
    चांदवड –२३ –११ –२८,५८५
    पेठ –२१ –९ –१०,२२७
    देवळा –१२ –५ –१०,२५९
    बागलाण –६ –३ –४,७९०
    सुरगाणा –५ –६ –६,६३९
    त्र्यंबकेश्वर –३ –१ –३९०
    एकूण ४३५ –१२७ –२,२७,७७७

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed