• Sun. Jun 14th, 2026

    शेतकऱ्यांचे गणित कोलमडले! नाशकात कांदा घसरल्याने उत्पादक चिंतेत, क्विंटलला मिळतोय ‘इतका’ दर

    शेतकऱ्यांचे गणित कोलमडले! नाशकात कांदा घसरल्याने उत्पादक चिंतेत, क्विंटलला मिळतोय ‘इतका’ दर

    Nashik Onion: कांद्याला सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने ‘कसमादे’ परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.

    onion AI photo (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)

    म. टा. वृत्तसेवा, मालेगाव: सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. कांद्याला सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने ‘कसमादे’ परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. त्यातच अवकाळी पावसाचे कहर सुरू असल्याने शेतकरी अस्मानी संकटात सापडले आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता शासनाने कांद्याला चार हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

    तालुक्यात यावर्षीदेखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली होती. मात्र, उन्हाळ कांदा बियाणे टाकण्यापासूनच शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला. कांदा लागवडीच्या काळात अवकाळी पाऊस झाल्याने रोप खराब झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तयार रोप आणून कांदा लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यातच लागवडीसाठी मजूर टंचाई भासत असल्याने जास्तीचे पैसे मोजून शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. त्यातच ऐन कांदा काढणीच्या वेळी ढगाळ वातावरण व अवकाळीने पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. अशा असंख्य संकटांमुळे एकरी सात ते आठ ट्रॉली निघणारा कांदा चार ते पाच ट्रॉलीच कांदा निघाला.
    Monsoon 2025 Update: केरळमध्ये २७ मेपर्यंत मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात कधी बरसणार? हवामान विभागाकडून मोठी अपडेट
    …म्हणून कोलमडले गणित
    खते, बियाणे व औषधांच्या किमतीत झालेली भरमसाठ वाढ, मजुरीचे वाढलेले दर, कांदा विक्रीसाठी बाजारात नेण्याचा वाहतूक खर्च याचा हिशोब केला, तर आजच्या बाजारभावाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीही परवडत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमडले आहे.
    सावधान! राज्यात दूध अन् दुग्धजन्य पदार्थांत भेसळ; FDAच्या शंभर दिवसांच्या अहवालातून माहिती समोर
    बाजारभावातही घसरण
    जे शेतकरी सधन आहेत. त्यांनी कांदा चाळ भरून ठेवल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पैसे नव्हते त्या शेतकऱ्यांनी कांदा लागवडीसाठी मित्र, नातलग यांच्याकडून हात उसनवार कर्ज घेतले आहे. ते मित्र व नातलग आता दिलेले पैसे परत मागत असल्याने व सध्या लग्नसराई सुरू असल्याने शेतकऱ्यांना कांदा विकण्याशिवाय गत्यंतर नाही. कांदा विकून आर्थिक गरजा भागविण्याच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांना बाजार भावातील घसरणीने अडचणीत आणले आहे.

    मुंगसे, उमराणे, नामपूर बाजार समित्यांची स्थिती (रुपये/प्रतिक्विंटल)
    उत्तम प्रतीच्या कांदा: ७०० ते ९००
    मध्यम प्रतीच्या कांदा ६०० ते ८००
    गोल्टी कांदा : १५० ते ३००

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed