Chandrapur Accident News : चंद्रपूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मोठी दुर्घटना घडली. पहिल्या घटनेत, नागभीड तालुक्यात दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत रमेश दडमल आणि राकेश बदन या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे, सिंदेवाहीजवळ तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांवर वाघाने हल्ला केल्याने कांता चौधरी, शुभांगी चौधरी आणि रेखा शेंडे यांचा मृत्यू झाला, ज्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार,जिल्हातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या किरमिटी येथील रमेश दडमल आपल्या बहिणीला घेण्यासाठी मुलासह सावली तालुक्यातील हरांबा येथे गेला होता. शुक्रवारी बहिणीला घेऊन परत निघाला. मृतक राकेश बदन हा सुधीर दडमल या मित्रासोबत मूल येथे कार्यक्रमाला जात होता. दोघांच्याही दुचाकीची सिंदेवाही तालुक्यातील सरडपारजवळ समोरासमोर धडक झाली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झालेत. नागरिकांनी दोघांनाही राजुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी किरमिटी येथे शोकाकुल वातावरणात दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Sangli News : जन्मानंतर तिसऱ्याच दिवशी बाळाचं अपहरण, पोलिसांनी ‘त्या’ गोष्टीवरून ४८ तासांत लावला शोध
वाघाने घेतला तिघांचा बळी
तेंदुपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या वनविभागाच्या परिक्षेत्रात घडली. या घटनेत एकाच कुटुंबातील सासू व सूनेचा मृत्यू झाला. मृतक महिलेचं नाव कांता बुधाजी चौधरी वय (65), शुभांगी मनोज चौधरी (28), रेखा शालिक शेंडे (50) असून हे तिघेही मेंढा माल गावातील आहे. घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी वनविभाग अधिकारी व पोलिस कर्मचारी दाखल झाले. वनविभाग अधिक तपास करीत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
