Chandrapur News : चंद्रपूरमध्ये एक दुःखद घटना घडली आहे. वैनगंगा नदीत बुडून तीन एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हे विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी आले होते. तिघेही गडचिरोलीतील एसबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होते. शनिवारच्या सुट्टीमध्ये ते नदीवर आले होते. बचावकार्यात पाच जणांना वाचवण्यात आले. मात्र, तिघांना वाचवण्यात यश आले नाही. प्रशासनाने रात्री शोध मोहीम थांबवली असून, उद्या पुन्हा सुरू होणार आहे.
आठ मित्र सुट्टीनिमित्त पोहण्यासाठी नदीवर आणि अचानकच…
मिळालेली अधिक माहिती अशी की, चंद्रपूर गडचिरोली सीमेवरील वैनगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेले गडचिरोली येथील तीन एमबीबीएसचे विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे तिन्ही विद्यार्थी बाहेर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गडचिरोली येथे एसबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत आहेत. घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि पोलिसांसह नागरिकही घटनास्थळी दाखल झाले.
Chandrapur News : कौतुकास्पद! भपकेबाज लग्नाला फाटा, चंद्रपूरच्या नवदाम्पत्याचा स्तुत्य निर्णय, पैसे वाचवून गावाला ‘मार्ग’ दाखवलाघटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल
सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलरवार हे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचलेले असून पाण्यात बुडालेल्या तिघांचा शोध हा घेतला जातोय. आज शनिवारची सुट्टी असल्याने आठ मित्र वैनगंगा नदीत पोहण्यासाठी आले होते. मात्र, यादरम्यान तिघेजण पाण्यात अचानक बुडाले. दरम्यान पाच जणांना पाण्यातून बाहेर पडण्यास यश मिळाले. मात्र, तिघेजण बुडाले.
अंधार झाल्याने शोध मोहिम थांबवली तिघेजण बुडाले
बुडालेल्या तिघांचे नाव गोपाळ गणेश साखरे, पार्थ बाळासाहेब जाधव, स्वप्नील उद्धवसिंग शिरे अशी आहेत. अनेक प्रयत्न करूनही तिघेही शोधकार्यदरम्यान सापडले नाही. शेवटी रात्र झाल्याने ही शोधमोहिम प्रशासनाकडून थांबवण्यात आली. उद्या परत शोधमोहिम ही सुरू केली जाईल. या घटनेने तिघांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हे तिघे नेमके कोणत्या गावाचे रहिवासी आहेत, याबद्दल अधिक माहिती ही मिळू शकली नाहीये. उन्हाचा चटका वाढत असल्याने अनेकजण नदीं आणि तलावात पोहण्यासाठी जातात. मात्र, बऱ्याचदा पाण्याचा अंदाज न आल्याने अशा घटना घडल्याचे समोर आलंय

