• Sun. Jun 7th, 2026
    शेततळ्यात गेले तर परतलेच नाही, काय घडलं? शेत मजुरीने कुटुंबाला आधार देणाऱ्या लेकांचा अंत

    Pachora News : जळगावातील पाचोरा तालुक्यात अंतुर्ली बुद्रुक येथे एका हृदयद्रावक घडना घडली आहे. दुर्घटनेत २१ वर्षीय आणि १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोघे शेतमजुरी करत असताना शेततळ्यात मृतावस्थेत आढळले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    (फोटो– Lipi)

    निलेश पाटील, जळगाव : जळगावातील पाचोरा तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथील दोन मुलांचा मृत्यू झाला असून त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. अंतुर्ली बुद्रुक शेती शिवारातील शेततळ्यात बुडुन एका २१ वर्षीय आणि एका १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

    दोन मुलं शेततळ्यात बुडाली असल्याचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी रुग्ण वाहिका चालक निळकंठ पाटील आणि सागर पाटील यांच्या मदतीने दोन्ही मुलांना बाहेर काढून तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केलं.
    Jalgaon News : बारावीचा निकाल पाहिला, अपेक्षेहून कमी गुण मिळाले; तरुणाचं नको ते कृत्य; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

    नेमकं काय घडलं?

    पदमसिंह भगवान पाटील (वय – २१ वर्ष) रा. अंतुर्ली बुद्रुक ता. पाचोरा आणि रविंद्र परभत कोळी (वय – १४ वर्ष) रा. पुनगाव ता. पाचोरा हे दोघे शेत मजुरी करुन आपल्या कुटुंबाला आर्थिक पाठबळ देत होते. दरम्यान ८ मे रोजी सकाळी ८ वाजता पदमसिंग पाटील आणि रविंद्र कोळी हे कामावर गेले होते.
    Airstrikes Operation Sindoor : संपूर्ण देश झोपेत असताना भारताचा पाकिस्तानवर एअरस्ट्राइक, १० मुद्द्यांमध्ये जाणून घ्या मध्यरात्री काय घडलं?
    खूप वेळ झाला तरी घरी परत न आल्याने कुटुंबियांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास अंतुर्ली शेत शिवारातील एका शेत तळ्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. दोन्ही तरुणांचा मृतदेह एकाच वेळी शेततळ्यात आढळ्याने एकच खळबळ उडाली.

    Jalgaon News : शेततळ्यात गेले तर परतलेच नाहीत, तरुणांसोबत दुर्दैवी घटना; शेत मजुरी करुन कुटुंबाला आधार देणाऱ्या लेकांचा करुण अंत

    तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबावर शोककळा

    ग्रामस्थांच्या मदतीने आणि रुग्णवाहिका चालक निळकंठ पाटील आणि सागर पाटील यांच्या साहाय्याने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दोन्ही तरुणांना दाखल केलं. असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांचाही मृत्यू झाल्याचं सांगितलं. पदमसिंग पाटील याच्या पश्चात्य वृद्ध आई आणि एक विवाहित बहिण असं कुटुंब आहे. तर रविंद्र कोळी याच्या मागे कुटुंबात आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. काम करत असताना दोन्ही तरुणांचा शेत तळ्यात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed