• Sun. Mar 8th, 2026
    आधी राज ठाकरे म्हणाले एअर स्ट्राईक योग्य वाटत नाही, आता उद्धव ठाकरे म्हणतात…

    Uddhav Thackeray on Operation Sindoor : भारताने राबवलेल्या मोहिमेला ‘Operation Sindoor’ असे नाव देण्यात आल्याने भारतीयांची छाती अभिमानाने फुलली आहे. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई : भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारताने राबवलेल्या मोहिमेला ‘Operation Sindoor’ असे नाव देण्यात आल्याने भारतीयांची छाती अभिमानाने फुलली आहे. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

    याआधी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत, मात्र ऑपरेशन सिंदूरविषयी दोघांच्या मतामध्ये साम्य दिसत नाही. कारण राज ठाकरे यांनी ‘एअर स्ट्राईक करणं मला योग्य वाटत नाही’ असे म्हटले होते. तर उद्धव ठाकरेंनी मात्र हा हल्ला अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे.

    उद्धव ठाकरे काय म्हणाले?

    भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम !
    भारतीय सैन्याने पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे. पहलगाममध्ये 26 मायभगिनींचे कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्याने बदला घेतला. पाकिस्तानचे भारतातील ‘स्लीपर्स सेल’ उद्ध्वस्त करून दहशतवादाचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. भारतीय सैन्य सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सक्षम आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने ते दाखवून दिले. भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम !

    Uddhav Thackeray : आधी राज ठाकरे म्हणाले एअर स्ट्राईक योग्य वाटत नाही, आता उद्धव ठाकरे म्हणतात पाकिस्तानचे भारतातील ‘स्लीपर्स सेल’…

    Yogesh Kadam : वाघाने फक्त पंजा उगारलाय, अजून जबडा उघडायचाय; योगेश कदमांनी ललकारलं, म्हणतात POK ही ताब्यात…

    राज ठाकरे काय म्हणाले होते?

    पहलगाम हल्ल्यानंतर मी म्हटलं होतं, की हल्ला करणाऱ्यांना असा धडा शिकवायला पाहिजे, जो त्यांच्या पुढील पिढ्यांना लक्षात राहायला पाहिजे. युद्ध हे उत्तर नाही, अमेरिकेत दोन ट्विन टॉवर पाडले, त्यांनी काही युद्ध नाही केलं, अतिरेकी ठार मारले. दुसऱ्या देशात युद्ध परिस्थिती आणायची, मॉक ड्रिल करायचे, सायरन वाजवायचे, पण ही गोष्ट का घडली याचा आपण विचार करणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.
    Himanshi Narwal : हिमांशी सारखं विचारत होती, सरकार कधी उत्तर देणार? ऑपरेशन सिंदूरनंतर नारवाल कुटुंब म्हणतं, विनयचं पार्थिव…
    पाकिस्तान अगोदरच बरबाद झालेला देश आहे, त्याला काय बरबाद करणार आहात. प्रश्न असा आहे की, ज्या अतिरेक्यांनी हा हल्ला केला ते सापडलेले नाहीत. ज्या ठिकाणी इतकी वर्षे हजारो पर्यटक जातात, तिथे सिक्युरिटी का नव्हती. मला वाटतं हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आपल्या देशात कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना हुडकून कढणं महत्त्वाचं आहे. एअर स्ट्राईक करून लोकांना भरकटावून हा काही पर्याय किंवा हे उत्तर होऊ शकत नसल्याचं राज ठाकरे म्हणाले होते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed